AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर आम्हीही तुझ्याशी बोललो नसतो, पक्ष फुटीनंतर घरात नेमकं काय घडलं?; रोहित पवार यांनी सांगितला किस्सा

बारामीत लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार लढत होणार आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबातच ही लढत होणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पवार कुटुंबातही दोन गट पडल्याचं दिसून आलं आहे. आमदार रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. प्रचाराच्यावेळी त्यांनी कुटुंबातील एक किस्साही सांगितलाय.

तर आम्हीही तुझ्याशी बोललो नसतो, पक्ष फुटीनंतर घरात नेमकं काय घडलं?; रोहित पवार यांनी सांगितला किस्सा
रोहित पवार यांचा अजित पवार गटावर निशाणाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 22, 2024 | 9:05 PM
Share

अजित पवार यांनी बंड केलं आणि पक्षात फूट पडली. अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या या निर्णयामुळे नुसता राष्ट्रवादी पक्षच फुटला नाही, तर पवार कुटुंबही फुटलं. कुटुंबात दोन गट पडले. कुटुंबातील काही लोकांनी अजितदादांनी साथ दिली. तर काहींनी शरद पवारांना. पण शरद पवार यांना साथ देणारा कुटुंबातील घटक अधिक आहे. पक्ष फुटण्याच्या काळात कुटुंबात नेमकं काय घडत होतं. घरातील मुलांवर काय परिणाम होत होता, त्यांची मानसिकता काय झाली होती? याची प्रचिती देणारा एक किस्साच आमदार रोहित पवार यांनी सांगितला. त्यावरून पवार कुटुंबातील आजच्या पिढीवर या पक्ष फुटीचा किती खोल परिणाम झाला हे स्पष्ट होतं.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे इंदापुरात होते. प्रचार करत असताना एका सभेत त्यांनी घरातीलच किस्सा सांगितला. आमचे आजोबा शरद पवार यांनी 60 वर्ष जो विचार जपला तो विचार ते आजही जपत आहेत. त्यांनी त्यांची भूमिका बदललेली नाही. जेव्हा ही कुटुंब फुटल्याची घटना घडली तेव्हा माझ्या लहान मुलांनी मला विचारले की, तू कुणाबरोबर आहेस? मी सांगितले मी आजोबा बरोबर आहे. त्यावर ते म्हणाले, तू जर आजोबा बरोबर गेला नसतास तर आम्ही तुझ्याशी बोललो नसतो, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

मुलं म्हणाली असती गेट आऊट…

माझी मुलं एवढंच बोलून थांबली नाहीत. मुलं म्हणाली, आता आम्ही लहान आहोत. ज्या वेळेस आम्ही शिकून मोठे झालो असतो, त्यावेळेस तुला सांगितलं असतं की, आता तू तुझं वेगळं घर बघ, असं रोहित पवार म्हणाले. म्हणजे याची भीती अशी आहे की 15 वर्षांनी माझी मुलं देखील मला म्हटले असते की, जा आता तू गेट आउट. यावर मला युक्तिवाद करता आला नसता. कारण मी माझ्या आजोबांबरोबर असं वागलो असतो तर माझी मुलंही माझ्याशी तशीच वागली असती, असा कौटुंबिक किस्साच रोहित पवार यांनी सांगितला.

माझा अरविंद केजरीवाल होणार

माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. मात्र ते माहीत असतानाही मीही भूमिका घेतली. कारण ती खरी भूमिका घेणं फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे आमच्यावर बऱ्याच कारवाई झाल्या आणि आणखीन होणार आहेत. लोकसभा झाल्यानंतर कदाचित दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी देखील माझ्यावर कारवाई केली जाईल, असं काही भाजपच्याच लोकांनी मला सांगितले आहे. जे भाजपच्या कोअर कमिटीमध्ये बसतात त्यांनी सांगितलंय की, लोकसभा झाल्यानंतर त्याच्याकडे बघू. त्याचा अरविंद केजरीवाल करू. मात्र आम्ही त्यास घाबरत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली