AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा विमान अपघात झाला त्यावेळी कागदं का जळाले नाहीत? मोठी माहिती समोर

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये विमानात असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला, मात्र विमानातील कागदपत्रं जळाले नाहीत, त्यावरून शंका व्यक्त केली जातं होती, आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

अजितदादांचा विमान अपघात झाला त्यावेळी कागदं का जळाले नाहीत? मोठी माहिती समोर
अजित पवार यांचा विमान अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 8:30 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीवर धडकलं, विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट झाला आणि विमानानं पेट घेतला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान विमानाच्या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, विमानाला भीषण आग लागली होती, मात्र त्यामध्ये विमानामध्ये असलेली कागदपत्रं जळाली नाहीत, म्हणून अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली, आता त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माजी एअर फोर्स अधिकारी अजय परांजपे यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजय परांजपे?

अजित पवार यांच्या विमानाचा घातपात करणे शक्य नाही, इतका अचूक घातपात करणं हे खूप कठीण काम आहे. विमानात सीसीटीव्ही बसवायला हवेत, पण का बसवले जात नाहीत हे कळत नाही.  विमान कधीच एका कारणाने क्रॅश होत नाही. त्यामागे दोन  ते तीन कारणं असतात. मुंबईवरून आलेले विमान थेट रणवेवर उतरू शकत होत. त्याच दिशेने धावपट्टी होती. विमान वळवायची गरज नव्हती.सूर्य उगवला होता. त्याची किरणे असल्याने पायलटला धावपट्टी न दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे. दृश्यमानता  तीन किलोमीटरपर्यंत होती असं एटीसीने सांगितलं आहे.  मात्र बारामतीच्या एअरपोर्टवर एअर कंट्रोनिक सोयी नाहीत, त्यामुळे तिथे दृश्यमानतेची गरज ही पाच किलोमीटरची आहे, हे नोट करण्यासारखं आहे, असं परांजपे यांनी म्हटलं आहे. ते विमान रणवेच्या खूप जवळच असल्याने विमानाला जास्त उंची भेटली नाही. रणवेचा अंदाज आला नाही, आणि ते कोसळलं, असंही ते म्हणाले.

दरम्यान विमानाचा अपघात झाला, त्यानंतर विमानाला आग लागली, मात्र या आगीमध्ये विमानातील कांगदपत्रं जळाली नाहीत, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विमान क्रॅश झालं आहे,  त्यामुळे त्याचे तुकडे झाले. अशावेळी कुठलीही गोष्ट कुठेही फेकली जाते. कागदं हे बांधलेले नव्हते म्हणून ते बाहेर उडाले असं यावेळी परांजपे म्हणाले.

Follow Us
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल.
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंमुळेच शिंदे आज फडणवीसांच्या मंत्रिमंडळात; राऊतांचा पलटवार.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल.
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड
वन्यजीवांनाही सोडलं नाही, भोंदू खरातचे किळसवाणे कारनामे उघड.
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.