AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा विमान अपघात झाला त्यावेळी कागदं का जळाले नाहीत? मोठी माहिती समोर

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये विमानात असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला, मात्र विमानातील कागदपत्रं जळाले नाहीत, त्यावरून शंका व्यक्त केली जातं होती, आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

अजितदादांचा विमान अपघात झाला त्यावेळी कागदं का जळाले नाहीत? मोठी माहिती समोर
अजित पवार यांचा विमान अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 06, 2026 | 8:30 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनीवर धडकलं, विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट झाला आणि विमानानं पेट घेतला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान विमानाच्या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, विमानाला भीषण आग लागली होती, मात्र त्यामध्ये विमानामध्ये असलेली कागदपत्रं जळाली नाहीत, म्हणून अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली, आता त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माजी एअर फोर्स अधिकारी अजय परांजपे यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजय परांजपे?

अजित पवार यांच्या विमानाचा घातपात करणे शक्य नाही, इतका अचूक घातपात करणं हे खूप कठीण काम आहे. विमानात सीसीटीव्ही बसवायला हवेत, पण का बसवले जात नाहीत हे कळत नाही.  विमान कधीच एका कारणाने क्रॅश होत नाही. त्यामागे दोन  ते तीन कारणं असतात. मुंबईवरून आलेले विमान थेट रणवेवर उतरू शकत होत. त्याच दिशेने धावपट्टी होती. विमान वळवायची गरज नव्हती.सूर्य उगवला होता. त्याची किरणे असल्याने पायलटला धावपट्टी न दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे. दृश्यमानता  तीन किलोमीटरपर्यंत होती असं एटीसीने सांगितलं आहे.  मात्र बारामतीच्या एअरपोर्टवर एअर कंट्रोनिक सोयी नाहीत, त्यामुळे तिथे दृश्यमानतेची गरज ही पाच किलोमीटरची आहे, हे नोट करण्यासारखं आहे, असं परांजपे यांनी म्हटलं आहे. ते विमान रणवेच्या खूप जवळच असल्याने विमानाला जास्त उंची भेटली नाही. रणवेचा अंदाज आला नाही, आणि ते कोसळलं, असंही ते म्हणाले.

दरम्यान विमानाचा अपघात झाला, त्यानंतर विमानाला आग लागली, मात्र या आगीमध्ये विमानातील कांगदपत्रं जळाली नाहीत, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विमान क्रॅश झालं आहे,  त्यामुळे त्याचे तुकडे झाले. अशावेळी कुठलीही गोष्ट कुठेही फेकली जाते. कागदं हे बांधलेले नव्हते म्हणून ते बाहेर उडाले असं यावेळी परांजपे म्हणाले.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा