AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागणार? NDA पेक्षा INDIA आघाडीला जास्त फायदा, पाहा कोणाला किती जागा मिळणार?

पाच राज्यांचा सी व्होटरच्या सर्वेक्षण अहवाल समोर आला होता. यात पाचपैकी चार राज्यात भाजपने आघाडी घेतली होती. परंतु, महाराष्ट्रात मात्र काहीसे वेगळे चित्र दिसणार आहे असे या सर्वेक्षण अहवालातून समोर आलेय. तर पश्चिम बंगालमध्येही भाजपला यश मिळणे कठीण आहे असे हा अहवाल सांगत आहे.

महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागणार? NDA पेक्षा INDIA आघाडीला जास्त फायदा, पाहा कोणाला किती जागा मिळणार?
maharashtra mahayuti VS mahavikas aghadi Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Dec 24, 2023 | 9:18 PM
Share

नवी दिल्ली | २३ डिसेंबर २०२३ : देशात लोकसभा निवडणुकांचे वातावरण तयार होऊ लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. एप्रिल-मे महिन्यात देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. भाजप तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. तर, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भारत आघाडीही आपल्या विजयाचा दावा करत आहे. दरम्यान, एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीए आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

सी व्होटरचा सर्वेक्षण अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि कॉंग्रेस हे घटक पक्ष आहेत. तर, शिवसेना (एकनाथ शिंदे), अजित पवार (राष्ट्रवादी) आणि भाजप यांची महायुती आहे.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भाजप महायुतीला मागे टाकू शकते असे या अहवालावरून दिसून येत आहे. एनडीए युतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एनडीएला ३७ टक्के मते मिळण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी NDA ने 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. UPA ला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. NDA मधील भाजपला 23, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. त्याचवेळी एआयएमआयएमचा एक खासदारही विजयी झाला होता.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचेच वर्चस्व

सी व्होटरच्या सर्वेक्षणात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीमसीला 23 ते 25 ​​जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. येथे भाजपला 16 ते 18 जागा तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला शून्य ते दोन जागा मुली शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भाजपने त्यावेळी 18 जागा जिंकल्या होत्या तर टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या खात्यात दोन जागा गेल्या होत्या.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.