AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal | पांढरे सोने झाले कोळशाच्या धुळीत काळे! वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं लोकांचे आयुष्यचं काळवंडले?

यवतमाळ : जिल्ह्याचं प्रमुख पीक कापूस. याला पांढरे सोने असं म्हणतात. पण, वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं या भागात प्रचंड प्रमाणात धूळ साचते. पांढरे सोने कोळशाच्या धुळीत अक्षरशः काळे होते. याच कोळसा खाणींमुळं नागरिकांचे आयुष्य काळवंडले आहे. ओव्हरलोड ट्रकची धूळ रस्त्यावरून शेतात दीपक मते हे पिंपळगावचे सरपंच. ते सांगतात, पिंपळगाव, जुनाड, कोलार या खाणींचा माल वणीला जातो. […]

Yavatmal | पांढरे सोने झाले कोळशाच्या धुळीत काळे! वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं लोकांचे आयुष्यचं काळवंडले?
वणी - कापसाच्या शेतातील कोळशाच्या धुळीची पाहणी करताना शेतकरी.
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 12:25 PM
Share

यवतमाळ : जिल्ह्याचं प्रमुख पीक कापूस. याला पांढरे सोने असं म्हणतात. पण, वेकोलीच्या कोळसा खाणीमुळं या भागात प्रचंड प्रमाणात धूळ साचते. पांढरे सोने कोळशाच्या धुळीत अक्षरशः काळे होते. याच कोळसा खाणींमुळं नागरिकांचे आयुष्य काळवंडले आहे.

ओव्हरलोड ट्रकची धूळ रस्त्यावरून शेतात

दीपक मते हे पिंपळगावचे सरपंच. ते सांगतात, पिंपळगाव, जुनाड, कोलार या खाणींचा माल वणीला जातो. या मार्गावर कोरला, पिंपरी, ब्राम्हणी, अशी गावे आहेत. या रस्त्यांवर ओव्हरलोड ट्रक चालतात. कोलवॉशरीजमधून ओव्हरलोड ट्रक जातात. या वाहतुकीमुळं रस्त्यावर कोळसा पडतो. त्यावरून गाड्या जातात. या धुळीमुळं गावातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

लोकं श्वसनाच्या आजाराने त्रस्त

या कोळशाच्या धुळीमुळं श्वसनाचे आजार होत आहेत. शेतीचेही नुकसान होत आहे. कापसाच्या झाडांवर कोळश्याच्या धुळीचे थर साचतात. कापसाचे येणारे पांढरे सोने धुळीनं काळवंडते. कोलमडून जाते. अशाठिकाणी कापूस वेचायला महिला मिळत नाहीत. दुप्पट पैसे देऊनही धुळीतील कापूस वेचायला महिला नकार देतात. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी दीपक मते यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं केली आहे.

पाहुणे अवदसा पाहून निघून जातात

निळापूर येथील युवक सांगतात, कोळसा वॉशरीज आणि धुळीमुळं त्रास होत आहे. यासाठी आम्ही तक्रारी करतो. पण, आमच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. ओव्हरलोड वाहतूक होत असल्यानं रस्त्याची चाळण झाली आहे. कापूस लावल्यानंतर त्याची लागतही निघत नाही, अशी परिस्थिती या धुळीमुळं होते. जनावर धुळीचा चारा खात नाहीत. रात्री ठेवलेल्या पाण्यावर धुळीचे थर साचतात. ते पाणी पिणेही जनावर टाळतात. पाहुणे आले तर ही सारी अवदसा पाहून लगेच काढता पाय घेतात.

सीएसआर फंड कुठे खर्च होतो?

पर्यावरण व मानवी आरोग्याची हानी रोखण्यासाठी वेकोलीच्या सीएसआर फंडातून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकूण उत्पन्नापैकी दोन टक्के सीएसआर फंड परिसरातील पाच किलोमीटर भागात खर्च करायचे असतात. पण, हा फंड कुठे खर्च होतो, हे दिसत नाही.

समस्या संपता संपेना

8-10 दिवसांनी वॉशरीजला पाठविले जाते. पण, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सहानुभुती मिळत नाही. अपघात झाल्यास पोलीस येतात. चौकशी करतात, निघून जातात. पण, समस्या संपता काही संपत नाही, अशी व्यथा येथील युवक बोलून दाखवितात.

Congress | नागपूरचे छोटू भोयर प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे; आपसातील वाद कसे मिटणार?

Polling | विदर्भातील नगरपंचायतीत 76.83, तर भंडारा-गोंदियात झेडपीत 66 टक्के मतदान, चर्चा आता कोण जिंकून येणार याची!

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.