AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार, संजय राठोड नेमकं काय म्हणाले

शिवसेनेचा दसरा मेळावा हा विचाराच सोनं लुटण्याचा दिवस आहे. खरी शिवसेना कोणती हा विषय न्यायालयाकडं प्रलंबित आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख कार्यकर्त्यांना विचार द्यायचे. हा विचार घेऊन लोकं काम करायचे.

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार, संजय राठोड नेमकं काय म्हणाले
Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 25, 2022 | 5:06 PM
Share

विवेक गावंडे, Tv9 मराठी प्रतिनिधी, यवतमाळ : राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काल जाहीर झाली. यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची यवतमाळ व वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली. यासंदर्भात बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले, माझ्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. सर्व पालकमंत्र्यांनी नियोजनाचा भाग पाहायचा आहे. यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी, सिंचन, आरोग्य , वीज असे विविध प्रश्नांचे नियोजन करू. या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे आव्हान

शिवसेनेचा दसरा मेळावा हा विचाराच सोनं लुटण्याचा दिवस आहे. खरी शिवसेना कोणती हा विषय न्यायालयाकडं प्रलंबित आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख कार्यकर्त्यांना विचार द्यायचे. हा विचार घेऊन लोकं काम करायचे.

मधल्या काही दिवसांत आपण पाहिलं आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेनेमधून 40 आमदार आणि इतर दहा आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेल्या हिंदुत्व विचाराची युती आम्ही केली. सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र प्रगतीपथावर नेणं हे आव्हान आहे.

विद्यार्थी, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत

राज्यातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्या दृष्टीनं मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व मंत्री काम करणार आहोत. ही भूमिका एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मांडतील.

या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक येतील. हे एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकायला येणार आहेत. विकासा संदर्भातील मार्गदर्शन एकनाथ शिंदे करणार आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.