अनेक तास बचावकार्याचा थरार, हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसला, अखेर 8 ते 10 तासांनी 110 जणांचे प्राण वाचले

यवतमाळच्या आनंदनगर महागाव येथे अडकलेल्या 110 जणांची अखेर सुखरुप सुटका झालीय. पण गेल्या आठ ते दहा तासांपासून या नागरिकांच्या सुटकेसाठी बचावकार्याचा थरार सुरु होता.

अनेक तास बचावकार्याचा थरार, हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसला, अखेर 8 ते 10 तासांनी 110 जणांचे प्राण वाचले
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 8:33 PM

यवतमाळ | 22 जुलै 2023 : यवतमाळमध्ये गेल्या 24 तासात 240 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे पूस आणि पैनगंगा नद्यांना पूर आलाय. या पुराच्या पाण्याने आनंदनगर महागावला चारही बाजूने अक्षरश: वेढा घातला. गावातील घरांमध्ये पाणी शिरलं. गावचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. आनंदनगर महागाव जिथे वसलं आहे तिथे पैनगंगा आणि पूस नदीचा संगम आहे. याशिवाय गावाच्या एका बाजूने नालादेखील वाहतो. त्यामुळे गावकरी चारही बाजूने अडकून पडले. या गावकऱ्यांची जवळपास 110 इतकी संख्या होती. गावकऱ्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून प्रशासनाला मदतीसाठी विनंती केली. पण गावात जाण्यासाठी कोणताच रस्ता नसल्याने प्रशासनदेखील चिंतेत पडलं.

या दरम्यान आनंदनगर महागावचे 80 ते 100 गावकरी पुराच्या पाण्यात अडकल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली. प्रशासन सुरुवातीला जो रस्ता पाण्याखाली गेला त्याने नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतं. पण नंतर प्रवाह वाढल्याने ते प्रयत्न देखील निष्फळ ठरलं. पुरात अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश होता. त्यामुळे धाकधूक वाढली होती. या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरात अडकलेल्या सर्व गावकऱ्यांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू केलं जाईल, असं सांगितलं.

हेलिकॉप्टरने बचावकार्याचा प्रयत्न अयशस्वी

देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर लगेच काही काळाने घटनास्थळी हेलिकॉप्टर दाखल झालं. हेलिकॉप्टर हवेत घिरट्या मारत होतं. पण हेलिकॉप्टरला खाली उतरण्यासाठी जागा नव्हती. वातावरण खराब होतं आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हेलिकॉप्टरचा प्रयत्न अयशस्वी ठरला. हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी आले होते. या हेलिकॉप्टरने दोनवेळा प्रयत्न करण्यात आला. पण दोन्हीवेळा प्रयत्न अयशस्वी ठरला.

आठ ते दहा तासांच्या प्रयत्नांनी गावकऱ्यांची सुटका

हेलिकॉप्टरचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर एसडीआरएफचं पथक बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरलं. या पथकाने बोटीच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू सुरु केलं. यामध्ये त्यांना यश आलं. एसडीआरएफच्या पथकाने तब्बल 110 नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढलं. यातील आनंदवाडी येथील 85 नागरिक शाळेत हलविण्यात आले. तर इतर 25 नागरिक हे नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले. मागील 8 ते 10 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. या रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून सर्वांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एसडीआरएफच्या टीमचं अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर या रेस्क्यू ऑपरेशनवर समाधान व्यक्त केलं आहे. “यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आताच प्राप्त माहितीनुसार, महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे अडकलेल्या सर्व 110 नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखरेखीत #SDRF चमूने बोटींच्या साहाय्याने हे मिशन पूर्ण केले. संपूर्ण टीमचे अभिनंदन”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.