AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत; चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला; परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

Yavatmal : चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत;  चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला
चालत्या एसटीची दोन चाके निघाली, एक चाक थेट नदीत; चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळलाImage Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 10:51 AM
Share

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी येथील एसटी (ST) आगाराची बस गडचांदूरकडे प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक बसचे मागील चाक निखळून ते नदीत (River) पडले. परंतु यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अपघात टाळला. या बसमध्ये त्यावेळी 18 प्रवासी बसून होते. ही घटना मंगळवारी दुपारी चारगावजवळ घडली आहे. आत्तापर्यंत एसटीचे अनेक अपघात झालेले आहेत. परंतु नुकताच झालेला अपघात हा विचित्र आहे. कारण अचानक गाडीचं चाक निघाल्याने चालकाची भंबेरी उडाली होती. चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचा जीव वाचला आहे. सध्या त्या गाडीची पाहणी करण्यात येत आहे. कारण अचानक अपघात झाल्याने आगारावरती टीकेची झोड उठली आहे.

ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी 18 प्रवासी एसटीत होते

वणीवरून गडचांदूरला बस क्रमांक एम एच 40-8953 जात होती. या बसमध्ये जवळपास 18 प्रवासी तसेच नदीच्या पुलावर चालत्या बसची मागील दोन चाके निखळली. यातील एक चाक नदीत पडले, तर दुसरे चाक रस्त्यात अडकल्याने जाग्यावर थांबले. ज्यावेळी गाडीचा अपघात झाला त्यावेळी चालक मुलनकर व वाहक अविनाश बोबडे हे एसटीत होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशी देखील घाबरले होते. ज्यावेळी दोन्ही चाकं निघाली, त्यावेळी गाडीत आरडाओरड आणि गोंधळ सुरु झाला होता. पण एसटी थांबल्यानंतर गोंधळ पुर्णपणे बंद झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला; परंतु प्रवाशांत काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. चारगाव ते गडचांदूरपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदी शेजारी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात एसटीच्या गलथान कारभारावरती सुद्धा नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे एसटीचं आगार पुन्हा चर्चेत आलं आहे. ना दुरुस्त गाडी का दिली अशी विचारणा लोक करीत आहेत.

Follow Us
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.