AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today | सोने गुंतवणुकदारांचा हिरमोड, मुंबईसह प्रमुख शहरांत भाव घसरले

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये सरासरी 70 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49640 व 22 कॅरेट सोन्याला 47640 रुपये भाव मिळाला.

Gold Price Today | सोने गुंतवणुकदारांचा हिरमोड, मुंबईसह प्रमुख शहरांत भाव घसरले
Gold (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 21, 2022 | 5:15 PM
Share

 नवी दिल्ली- गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह प्रमुख शहरात काल (गुरुवारी) 400 रुपयांची वाढ नोंदविली गेली होती. सोने गुंतवणुकदारांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, आज (शुक्रवारी) सोने भावातील घसरणीमुळे गुंतवणुकदारांचा हिरमोड झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये सरासरी 70 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली. आर्थिक राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49640 व 22 कॅरेट सोन्याला 47640 रुपये भाव मिळाला. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याला (DELHI GOLD RATE) प्रति तोळा 52100 रुपये भाव मिळाला तर 22 कॅरेट सोने प्रति तोळे 47800 रुपयांवर पोहोचले. मुंबईखालोखाल पुण्यातही सोन्याची भाववाढ नोंदविली गेली. उपराजधानी नागपूरमध्ये (NAGPUR GOLD RATE) 24 कॅरेट सोने 49640 रुपयांवर पोहोचले.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव-

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर :

• मुंबई- 49640 रुपये (रु.50वाढ) • पुणे- 49450 रुपये (रु.80वाढ) • नागपूर- 49640 रुपये (रु.50वाढ) • नाशिक- 49450 रुपये (रु.80वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर:

• मुंबई- 47640 रुपये (रु.50) • पुणे- 46900 रुपये(रु.70) • नागपूर- 47640 रुपये(रु.50) • नाशिक- 46900 रुपये(रु.70)

आर्थिक तज्ज्ञांचं भाकीत:

सोने गुंतवणूक सुरक्षिततेचा पर्याय मानला जातो. सलग तीन दिवस दिल्लीत सोन्याला मोठी उसळी मिळत आहे. प्रति दिवस पाचशे रुपयांहून अधिक भाववाढ नोंदविली जात आहे. त्यामुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोने भाववाढीचा आलेख चढाच राहिला आहे.

सोन्याचे भाव एका मिस्ड् कॉलवर:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

भूमिका केली म्हणजे समर्थन केले असे नाही, जयंत पाटलांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, पॅरालिम्पिकपटू अवनी लेखराला स्पेशल सीट असलेली कस्टमाइझ XUV700 दिली भेट

Anil Deshmukh : सचिन वाझेनी घेतली अनिल देशमुखांची शाळा, उलट तपासणीत काय घडलं; वाचा टू द पॉईंट

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली