‘भीम आर्मी’चे चंद्रशेखर आझाद मुंबईत नजरकैदेत

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद यांची  मुंबईत जाहीर सभा नियोजित आहे. मात्र या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. वरळीतील जांभोरी मैदानावर उद्या ही सभा नियोजित होती,  मात्र त्यापूर्वीच चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. मालाडमधील हॉटेल मनालीमध्ये आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या हॉटेलला […]

'भीम आर्मी'चे चंद्रशेखर आझाद मुंबईत नजरकैदेत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई: भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबईत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. चंद्रशेखर आझाद यांची  मुंबईत जाहीर सभा नियोजित आहे. मात्र या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. वरळीतील जांभोरी मैदानावर उद्या ही सभा नियोजित होती,  मात्र त्यापूर्वीच चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. मालाडमधील हॉटेल मनालीमध्ये आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. या हॉटेलला पूर्णपणे पोलिसांचा वेढा आहे. पोलिसांच्या कारवाईने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. दरम्यान आजच्याऐवजी उद्या सभा घेण्याची तयारी आझाद यांची आहे.

चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच मुंबई आणि महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. मात्र वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा इथं विजय दिवस साजरा केला जाणार आहे. भीमा कोरेगाव संघर्ष महासभेत चंद्रशेखर आझाद हे भाषण देणार आहेत. मात्र गेल्या वर्षी झालेला हिंसाचार लक्षात घेता, पोलिसांनी प्रचंड खबरदारी घेतली आहे. त्यामुळे तणावाची स्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवलं आहे.

कोण आहेत चंद्रशेखर आझाद? – चंद्रशेखर आझाद हे नाव उत्तर प्रदेशातील जातीय हिंसाचारानंतर सर्वांसमोर आलं. – या दंगलीनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने त्यांच्यावर रासुका कायद्यानुसार कारवाई केली. – देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे – सलग 16 महिने कारागृहात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची रासुका कायद्यातून काही दिवसांपूर्वीच सुटका झाली. – देशातील दलित जनतेचा आक्रमक नेता अशी त्यांची ओळख बनली.

भीम आर्मी चंद्रशेखर आझाद यांनी तीन वर्षापूर्वी भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. बहुजन समाजासाठी भीम आर्मी संघटनेची स्थापना केल्याचं आझाद यांचं म्हणणं आहे.दलित, बहुजन समाजाच्या सुरक्षेसाठी आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना काम करत असल्याचं आझाद यांनी सांगितलं.

चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा

29 डिसेंबर : मुंबईतील दादर चैत्यभूमी इथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार, संध्याकाळी 4 वाजता वरळीतील जांबोरी मैदान येथील महाराष्ट्र भीम आर्मी आयोजित पहिल्या आंबेडकरी जनचेतना सभेला मार्गदर्शन 30 डिसेंबर : पुण्यातील एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन 31 डिसेंबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद आंबेडकरी तरुणाईशी या कार्यक्रमाचे आयोजन 1 जानेवारी 2019 – भीमा कोरेगावच्या क्रांतीस्तंभास अभिवादन करुन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून विजय स्तंभावर पुष्पवृष्टीचं नियोजन 2 जानेवारी 2019 – लातूरमध्ये जाहीर सभा 4 जानेवारी 2019 – अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर जाहीर सभा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.