AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धवजी बदलले, पण इतके? 25 वर्षे सोबत होतो याचं वाईट वाटतंय : देवेंद्र फडणवीस

महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही.

उद्धवजी बदलले, पण इतके? 25 वर्षे सोबत होतो याचं वाईट वाटतंय : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Oct 08, 2020 | 6:57 PM
Share

मुंबई: महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कायदा केला. हे करताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता. मात्र, आताच्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का, अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis on Maratha Reservation)

आज मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. तसेच मराठा आंदोलकांचा उद्रेक अगदी योग्य असल्याचेही सांगितले. आंदोलनं ही चर्चेच्या माध्यमातून सुटतात. राज्यकर्त्यांना कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळाने दिले आहेत. मात्र, महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

उद्धवजी बदलले, पण इतके? 25 वर्षे सोबत होतो याचं वाईट वाटतंय : देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे खुली करण्यास सरकारने अद्याप परवानगी न दिल्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले. राज्य सरकारला मंदिरापेक्षा मदिरा महत्त्वाची वाटत आहे. मंदिरांमुळे कोरोना वाढतो, पण मदिरेमुळे नाही, असे त्यांना वाटते. ही सगळी परिस्थिती पाहता खरंच सरकारचं डोक ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

मान्य आहे उद्धवजी तुम्ही बदलले असाल पण एवढं कस बदललात? तुम्ही हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवताय ना मग हे काय? गेली २५ वर्ष तुमच्यासोबत होतो याचं वाईट वाटतंय. नवीन मित्र काय मिळाले तुम्ही सगळंच विसरून गेलात. पण आम्हाला सरकारला वठणीवर आणता येते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संंबंधित बातम्या:

मराठा समाजाच्या 10 तारखेच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

Bihar Election : शिवसेनेने हिंदुत्व सोडले, भाजपला बिहारमध्ये फरक पडणार नाही, भाजप खासदाराचा निशाणा

(Devendra Fadnavis on Maratha Reservation)

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.