AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?

रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

Unlock 2 | 'अनलॉक 2'मध्ये दोन किमीची 'लक्ष्मणरेषा', काय आहेत निर्बंध?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 29, 2020 | 7:43 AM
Share

मुंबई : राज्य सरकारकडून पुनश्च हरि ओम अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई पोलिसांनी प्रत्येक नागरिकासाठी दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’ आखून दिली आहे. कोविड-19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी वैयक्तिक काळजी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. (Mumbai Police Rules Regulations for Unlock Second Phase)

स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे आणि खालील नियम पाळावेत असे मुंबई आवाहन पोलिसांनी सर्वांना केले आहे.

काय आहेत निर्बंध?

1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.

2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.

3. घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 किमीच्या बाहेर जाऊ नये.

4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

5. कार्यालय किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच 2 किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

6. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

7. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

8. सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.

9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 या वेळेत असलेल्या कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

सर्व नागरिकांनी जबाबदारीने वागून अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी काल (रविवार 28 जून) दिवसभरात 4 हजार 864 गाड्या जप्त केल्या. मरिन ड्राईव्हपासून दहिसर-मुलुंडपर्यंत ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, झोन 10 मध्ये सर्वाधिक 1 हजार 297 गाड्या जप्त  करण्यात आल्या.

संबंधित बातम्या : 

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून 4 हजार 864 गाड्या जप्त

(Mumbai Police Rules Regulations for Unlock Second Phase)

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?