AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेमलमुळे 10 राज्यांना मिळणार दिलासा, महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा काय होणार परिणाम?

देशात सध्या तापमान वाढल्याने अनेकांना याचा फटका बसला आहे, उष्णतेमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र येथून मान्सून भारतात दाखल होत असतो. पण चक्रीवादळामुळे अनेक राज्यात पाऊस पडत आहे. महाराष्ट्रावर त्याचा काय परिणाम होणार जाणून घ्या.

रेमलमुळे 10 राज्यांना मिळणार दिलासा, महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा काय होणार परिणाम?
| Updated on: May 27, 2024 | 6:46 PM
Share

देशभरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या राज्यांमध्ये चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमध्ये कमाल तापमान 45 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे लोकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.

दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बंगाल, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळाचा परिणाम बिहार आणि झारखंडच्या काही भागातही दिसून आलाय. त्यामुळे तापमानात घट झाली असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

या राज्यात जोरदार पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ओडिशा, बंगाल, आंध्र प्रदेशचा काही भाग, ईशान्यकडील राज्य, बिहार, झारखंडमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे तापमानात घट झालीये. तापमान सामान्यपेक्षा खाली आले असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बंगालच्या उपसागरातील वादळाचा मात्र उत्तर भारतातील राज्यांवकर कोणताच परिणाम झालेला नाही. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात उष्णता कायम आहे. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार नाहीये. दिल्लीत ३० मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. 31 मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हिंद महासागर आणि अरबी समुद्रातून हिमालयाकडे येणाऱ्या वाऱ्यांवर मान्सून अवलंबून असतो. जेव्हा हे वारे भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील पश्चिम घाटावर आदळतात तेव्हा भारत आणि आसपासच्या देशांमध्ये पाऊस पडतो. भारतातील मान्सून केरळच्या किनारपट्टीवर आधी येतो. त्यानंतर देशात हळूहळू पावसाला सुरुवात होते. त्यानंतर उष्णतेपासून दिलासा मिळतो.

अनेक राज्यांमध्ये उष्णतेबाबत ‘रेड अलर्ट’

भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केलाय. राजस्थानमधील फलोदीमध्ये तर तापमान ५० अंशावर गेले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील किमान ३७ ठिकाणी रविवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले.

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव ३० मेपर्यंत दिसून येईल. त्यानंतर मान्सून दाखल होणार असल्याने हवामान सामान्य होण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटले आहे की सोमवारी दिवसभरात लोकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागेल. २७ मे रोजी पारा ४६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. 30 मे पर्यंत उष्णतेचा कहर सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....