AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जातून 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20 हजार मिळाले असते: राहुल गांधी

हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. | Rahul Gandhi

मोदींनी उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जातून 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20 हजार मिळाले असते: राहुल गांधी
| Updated on: Dec 31, 2020 | 11:41 AM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आतापर्यंत उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जाच्या रकमेतून देशातील अनेक कुटुंबांचे भले करता आले असते, असा दावा काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. (Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi)

नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षात उद्योगपतींचे 2378760000000 कर्ज माफ केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात एवढ्या पैशातून देशातील 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20-20 हजार रुपये देता आले असते. मात्र, तसे घडले नाही. हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

‘मोदींच्या ‘असत्याग्रहा’वर बळीराजांचा विश्वास नाही’

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बुधवारच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. मोदी सरकारची आश्वासने कशी पोकळ निघालीत याची पोलखोल त्यांनी केली. मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यासाठी मला 50 दिवस द्या असं ते म्हणाले होते.

कोरोना आला तेव्हा आम्ही 21 दिवसात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असं ते म्हणाले होते. आमच्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही, असंही ते म्हणाले होते. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

Rajeev Satav | पंतप्रधान किंवा भाजपला विचारुन राहुल गांधी परदेशात जाणार का? : राजीव सातव

मोदींच्या ‘असत्याग्रहा’वर बळीराजांचा विश्वास नाही; ‘त्या’ बैठकीपूर्वीच राहुल गांधींचं ट्विट

आम्हाला शांतता हवी, पण कोणी डिवचले तर सोडणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा

(Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi)

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.