AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Violence : हिंसेत २० जणांचा मृत्यू, ५०० घरं जाळली, सध्या परिस्थिती कशी आहे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंसाग्रस्त मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही. कालच्या तुलनेत आज चांगली परिस्थिती आहे.

Manipur Violence : हिंसेत २० जणांचा मृत्यू, ५०० घरं जाळली, सध्या परिस्थिती कशी आहे?
| Updated on: May 05, 2023 | 9:51 PM
Share

नवी दिल्ली : पूर्वोत्तर राज्य मणीपूरमध्ये हिंसेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली. अमित शाह यांनी मणीपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्यासोबत व्हिडीओ काँफरन्सिंगवरून बैठक घेतली. मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गृह मंत्रालयाने अर्धसैनिक दलाच्या १० अतिरिक्त कंपन्या पाठवण्याचा निर्णय घेतला. बैठकीत गृह मंत्रालय आणि मणीपूरचे वरिष्ठ अधिकार उपस्थित होते.

कालच्या तुलनेत मणीपूरमध्ये परिस्थिती चांगली आहे. सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी ही माहिती दिली. वेगवेगळ्या २३ ठिकाणी जवानांना तैनात करण्यात आले आहे. हिंसेत आतापर्यंत सुमारे १८ ते २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. १०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंसेत ५०० घरं जाळण्यात आली

कुलदीप सिंह यांनी सांगितलं की, हिंसेत सुमारे ५०० घरं जाळण्यात आली. हिंसेच्या पहिल्याच दिवशी आरोपींना अटक करण्यात आली. ९ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून नागरिकांनी चोरलेले हत्यार जप्त करण्यात आले. ६००९०३०४२२ आणि ०३८५२४५०२१४ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

काय आहे कलम ३५५

कलम ३५५ अन्वये केंद्र सरकार कोणत्याही राज्यातील सुरक्षा आणि कायदा व्यवस्था आपल्या हाती घेऊ शकते. राज्यात अशांतता माजल्यास हा उपाय करण्यात येतो. हिंसा भडकल्यानंतर शांत होत नसेल अशावेळी केंद्र सरकार हस्तक्षेप करते. परंतु, बैठकीत कलम ३५५ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंसाग्रस्त मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही. कालच्या तुलनेत आज चांगली परिस्थिती आहे.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.