AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manipur Violence : हिंसेत २० जणांचा मृत्यू, ५०० घरं जाळली, सध्या परिस्थिती कशी आहे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंसाग्रस्त मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही. कालच्या तुलनेत आज चांगली परिस्थिती आहे.

Manipur Violence : हिंसेत २० जणांचा मृत्यू, ५०० घरं जाळली, सध्या परिस्थिती कशी आहे?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 05, 2023 | 9:51 PM
Share

नवी दिल्ली : पूर्वोत्तर राज्य मणीपूरमध्ये हिंसेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली. अमित शाह यांनी मणीपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्यासोबत व्हिडीओ काँफरन्सिंगवरून बैठक घेतली. मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गृह मंत्रालयाने अर्धसैनिक दलाच्या १० अतिरिक्त कंपन्या पाठवण्याचा निर्णय घेतला. बैठकीत गृह मंत्रालय आणि मणीपूरचे वरिष्ठ अधिकार उपस्थित होते.

कालच्या तुलनेत मणीपूरमध्ये परिस्थिती चांगली आहे. सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी ही माहिती दिली. वेगवेगळ्या २३ ठिकाणी जवानांना तैनात करण्यात आले आहे. हिंसेत आतापर्यंत सुमारे १८ ते २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. १०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिंसेत ५०० घरं जाळण्यात आली

कुलदीप सिंह यांनी सांगितलं की, हिंसेत सुमारे ५०० घरं जाळण्यात आली. हिंसेच्या पहिल्याच दिवशी आरोपींना अटक करण्यात आली. ९ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून नागरिकांनी चोरलेले हत्यार जप्त करण्यात आले. ६००९०३०४२२ आणि ०३८५२४५०२१४ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

काय आहे कलम ३५५

कलम ३५५ अन्वये केंद्र सरकार कोणत्याही राज्यातील सुरक्षा आणि कायदा व्यवस्था आपल्या हाती घेऊ शकते. राज्यात अशांतता माजल्यास हा उपाय करण्यात येतो. हिंसा भडकल्यानंतर शांत होत नसेल अशावेळी केंद्र सरकार हस्तक्षेप करते. परंतु, बैठकीत कलम ३५५ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंसाग्रस्त मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही. कालच्या तुलनेत आज चांगली परिस्थिती आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत