AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhopal Gas Tragedy : दुर्घटनेच्या ४० वर्षानंतर शहराला ३७७ टन विषारी कचऱ्यापासून मिळाली मुक्ती, काय झाले नेमके ?

भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या कारखान्यातील विषारी कचरा हटविण्याची जबाबदारी चाळीस वर्षानंतर पार पाडण्यात आली आहे.

Bhopal Gas Tragedy : दुर्घटनेच्या ४० वर्षानंतर शहराला ३७७ टन विषारी कचऱ्यापासून मिळाली मुक्ती, काय झाले नेमके ?
Bhopal Gas Tragedy
| Updated on: Jan 02, 2025 | 5:55 PM
Share

भोपाळ गॅस दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेत कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने साडे पाच हजाराहून अधिक लोकांचा झोपेतच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार असलेला आणि सध्या खंडहर बनून उभा असलेल्या यूनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे ३३७ टन धोकादायक कचऱ्याला हटविण्याची प्रक्रिया या दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर बुधवारी अखेर सुरु झाली आहे.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी कचऱ्याने भरलेले १२ कंटेनर ट्रक भोपाळहून दूर २५० किमी अंतरावर धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात रवाना केले गेले. हा कचरा घेऊन १२ कंटेनर ट्रक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न थांबता रवाना केले असून या वाहनांसाठी खास ग्रीन कॉरीडॉर तयार केला आहे. सात तासात हे ट्रक धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात पोहचण्याची आशा असल्याचे भोपाळ गॅस गुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

रविवारी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी सुमारे ३० मिनिटांच्या शिफ्टमध्ये काम करुन कचरा पॅक करुन ट्रकमध्ये लोड केला. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली गेली. त्यांना दर अर्ध्या तासांनी आराम दिला गेला असेही स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

नष्ट व्हायला किती काळ लागेल हे सांगता

अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी सकाळी प्रसारमाध्यमांना सांगितले की सर्वकाही जर ठरल्यानुसार झाले तर हा विषारी कचरा तीन महिन्याच्या आत जाळला जाईल. अन्यथा या कामास नऊ महिन्यांचा कालावधी देखील लागण्याची शक्यता आहे.सुरुवातीला कचऱ्याचा काही भाग पीथमपूर येथील कचऱ्यातील डेपोत नष्ट केला जाईल. त्यानंतर राखेची तपासणी करुन यात काही हानिकारक तत्व तर राहिले नाही ना याची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

भोपाळ गॅस दुर्घटनेचा इतिहास

साल 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री यूनियन कार्बाईड किटनाशक फॅक्ट्रीमधून अत्यंत विषारी गॅस मिथाईल आयसोसायनेट (MIC) लिक झाला होता. त्याने जवळपास ५,४७६ जणांचे प्राण गेले तर पाच लाखांहून अधिक लोकांना आरोग्यविषयक समस्या आणि अपंगत्वाचा सामना आयुष्यभर करावा लागला. जगातील सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटनेपैकी एक मानली जाते.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं