AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhopal Gas Tragedy : दुर्घटनेच्या ४० वर्षानंतर शहराला ३७७ टन विषारी कचऱ्यापासून मिळाली मुक्ती, काय झाले नेमके ?

भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या कारखान्यातील विषारी कचरा हटविण्याची जबाबदारी चाळीस वर्षानंतर पार पाडण्यात आली आहे.

Bhopal Gas Tragedy : दुर्घटनेच्या ४० वर्षानंतर शहराला ३७७ टन विषारी कचऱ्यापासून मिळाली मुक्ती, काय झाले नेमके ?
Bhopal Gas Tragedy
| Updated on: Jan 02, 2025 | 5:55 PM
Share

भोपाळ गॅस दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेत कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने साडे पाच हजाराहून अधिक लोकांचा झोपेतच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार असलेला आणि सध्या खंडहर बनून उभा असलेल्या यूनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे ३३७ टन धोकादायक कचऱ्याला हटविण्याची प्रक्रिया या दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर बुधवारी अखेर सुरु झाली आहे.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी कचऱ्याने भरलेले १२ कंटेनर ट्रक भोपाळहून दूर २५० किमी अंतरावर धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात रवाना केले गेले. हा कचरा घेऊन १२ कंटेनर ट्रक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न थांबता रवाना केले असून या वाहनांसाठी खास ग्रीन कॉरीडॉर तयार केला आहे. सात तासात हे ट्रक धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात पोहचण्याची आशा असल्याचे भोपाळ गॅस गुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

रविवारी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी सुमारे ३० मिनिटांच्या शिफ्टमध्ये काम करुन कचरा पॅक करुन ट्रकमध्ये लोड केला. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली गेली. त्यांना दर अर्ध्या तासांनी आराम दिला गेला असेही स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

नष्ट व्हायला किती काळ लागेल हे सांगता

अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी सकाळी प्रसारमाध्यमांना सांगितले की सर्वकाही जर ठरल्यानुसार झाले तर हा विषारी कचरा तीन महिन्याच्या आत जाळला जाईल. अन्यथा या कामास नऊ महिन्यांचा कालावधी देखील लागण्याची शक्यता आहे.सुरुवातीला कचऱ्याचा काही भाग पीथमपूर येथील कचऱ्यातील डेपोत नष्ट केला जाईल. त्यानंतर राखेची तपासणी करुन यात काही हानिकारक तत्व तर राहिले नाही ना याची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

भोपाळ गॅस दुर्घटनेचा इतिहास

साल 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री यूनियन कार्बाईड किटनाशक फॅक्ट्रीमधून अत्यंत विषारी गॅस मिथाईल आयसोसायनेट (MIC) लिक झाला होता. त्याने जवळपास ५,४७६ जणांचे प्राण गेले तर पाच लाखांहून अधिक लोकांना आरोग्यविषयक समस्या आणि अपंगत्वाचा सामना आयुष्यभर करावा लागला. जगातील सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटनेपैकी एक मानली जाते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.