AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhopal Gas Tragedy : दुर्घटनेच्या ४० वर्षानंतर शहराला ३७७ टन विषारी कचऱ्यापासून मिळाली मुक्ती, काय झाले नेमके ?

भोपाळ गॅस दुर्घटनेला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या कारखान्यातील विषारी कचरा हटविण्याची जबाबदारी चाळीस वर्षानंतर पार पाडण्यात आली आहे.

Bhopal Gas Tragedy : दुर्घटनेच्या ४० वर्षानंतर शहराला ३७७ टन विषारी कचऱ्यापासून मिळाली मुक्ती, काय झाले नेमके ?
Bhopal Gas Tragedy
| Updated on: Jan 02, 2025 | 5:55 PM
Share

भोपाळ गॅस दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेत कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने साडे पाच हजाराहून अधिक लोकांचा झोपेतच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला जबाबदार असलेला आणि सध्या खंडहर बनून उभा असलेल्या यूनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे ३३७ टन धोकादायक कचऱ्याला हटविण्याची प्रक्रिया या दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर बुधवारी अखेर सुरु झाली आहे.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी कचऱ्याने भरलेले १२ कंटेनर ट्रक भोपाळहून दूर २५० किमी अंतरावर धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात रवाना केले गेले. हा कचरा घेऊन १२ कंटेनर ट्रक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न थांबता रवाना केले असून या वाहनांसाठी खास ग्रीन कॉरीडॉर तयार केला आहे. सात तासात हे ट्रक धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात पोहचण्याची आशा असल्याचे भोपाळ गॅस गुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

रविवारी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी सुमारे ३० मिनिटांच्या शिफ्टमध्ये काम करुन कचरा पॅक करुन ट्रकमध्ये लोड केला. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली गेली. त्यांना दर अर्ध्या तासांनी आराम दिला गेला असेही स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

नष्ट व्हायला किती काळ लागेल हे सांगता

अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी सकाळी प्रसारमाध्यमांना सांगितले की सर्वकाही जर ठरल्यानुसार झाले तर हा विषारी कचरा तीन महिन्याच्या आत जाळला जाईल. अन्यथा या कामास नऊ महिन्यांचा कालावधी देखील लागण्याची शक्यता आहे.सुरुवातीला कचऱ्याचा काही भाग पीथमपूर येथील कचऱ्यातील डेपोत नष्ट केला जाईल. त्यानंतर राखेची तपासणी करुन यात काही हानिकारक तत्व तर राहिले नाही ना याची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.

भोपाळ गॅस दुर्घटनेचा इतिहास

साल 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री यूनियन कार्बाईड किटनाशक फॅक्ट्रीमधून अत्यंत विषारी गॅस मिथाईल आयसोसायनेट (MIC) लिक झाला होता. त्याने जवळपास ५,४७६ जणांचे प्राण गेले तर पाच लाखांहून अधिक लोकांना आरोग्यविषयक समस्या आणि अपंगत्वाचा सामना आयुष्यभर करावा लागला. जगातील सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटनेपैकी एक मानली जाते.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.