AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात काम करणाऱ्या मुलांवरही बालमजुरीचे कायदे लागू होतात का? वाचा पूर्ण माहिती!

"बालमजुरी गुन्हा आहे!" पण गावाकडचं पोरगं घरात किंवा शेतात आई-वडिलांना मदत करतंय, ते पण याच 'गुन्ह्यात' मोडतं का? कायदा काय सांगतो याबद्दल? अनेकांच्या मनात हा गोंधळ असतो. चला, बालमजुरीची नेमकी व्याख्या आणि घरातल्या कामामागचं वास्तव समजून घेऊया!

शेतात काम करणाऱ्या मुलांवरही बालमजुरीचे कायदे लागू होतात का? वाचा पूर्ण माहिती!
child labourImage Credit source: Tv9 Gujarati
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 16, 2025 | 5:17 PM
Share

“बालमजुरी हा गुन्हा आहे,” हे आपण नेहमीच ऐकतो. पण नक्की कोणतं काम बालमजुरीच्या कक्षेत येतं, याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो. विशेषतः भारतासारख्या ग्रामीण भागात, जिथे अनेक कुटुंब शेतीवर किंवा घरगुती कामांवर अवलंबून आहेत, तिथे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. गावाकडे अनेक मुलं शाळेतून आल्यावर आई-वडिलांना मदत करतात. मग हे सगळं बालमजुरीच म्हणायचं का?

‘बालमजुरी’ची व्याख्या काय?

सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या व्याख्येनुसार, साधारणपणे जर मुलाचं वय १४ वर्षांपेक्षा कमी असेल आणि ते मूल असं कोणतंही काम करत असेल, ज्यामुळे त्याच्या शिक्षणावर, मानसिक आणि शारीरिक विकासावर किंवा आरोग्यावर वाईट परिणाम होत असेल, तर ते ‘बालमजुरी’ मानलं जातं. भारताच्या बाल कामगार अधिनियम, १९८६ नुसार, १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही धोकादायक किंवा व्यावसायिक कामात गुंतवणं हे कायद्याने गुन्हा आहे. अर्थात, काही विशिष्ट कौटुंबिक व्यवसायांमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर हलक्या कामांसाठी काही अपवाद आहेत, पण तेही मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर परिणाम करणारे नसावेत.

घरातील काम बालमजुरी कधी ठरते?

आता महत्त्वाचा मुद्दा, जर एखादं गावखेड्यातील मूल घरात काम करत असेल किंवा शेतात मदत करत असेल, तर ते बालमजुरी म्हणायचं का? याचं उत्तर परिस्थितीवर अवलंबून आहे. जर मूल शाळेत जात असेल, अभ्यास करत असेल आणि त्यानंतर स्वतःच्या इच्छेने, आपल्या कुटुंबाला घरातल्या किंवा शेतातल्या हलक्या-फुलक्या कामांमध्ये मदत करत असेल, तर त्याला सामान्यतः बालमजुरी मानलं जात नाही. उदाहरणार्थ, घरात स्वच्छता करणं, पाणी भरणं किंवा शेतात छोटी-मोठी मदत करणं. ही कामं त्याच्या शिक्षणात किंवा आरोग्यात अडथळा आणणारी नसावीत.

परंतु, जर मुलाला शाळेत न पाठवता पूर्णवेळ घरच्या कामाला किंवा शेतीच्या कामाला जुंपलं जात असेल, किंवा ते काम त्याच्या वयाच्या मानाने खूप कठीण, धोकादायक किंवा जास्त तासांचं असेल, आणि त्या कामामुळे त्याच्या शिक्षणावर, आरोग्यावर किंवा खेळण्या-बागडण्याच्या वयावर गंभीर परिणाम होत असेल, तर ते नक्कीच ‘बालमजुरी’च्या श्रेणीत येऊ शकतं. जरी ते काम आर्थिक गरजेपोटी केलं जात असलं, पण ते मुलाच्या मूलभूत हक्कांपासून त्याला वंचित ठेवत असेल, तर ते स्वीकारार्ह नाही.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत