AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात काम करणाऱ्या मुलांवरही बालमजुरीचे कायदे लागू होतात का? वाचा पूर्ण माहिती!

"बालमजुरी गुन्हा आहे!" पण गावाकडचं पोरगं घरात किंवा शेतात आई-वडिलांना मदत करतंय, ते पण याच 'गुन्ह्यात' मोडतं का? कायदा काय सांगतो याबद्दल? अनेकांच्या मनात हा गोंधळ असतो. चला, बालमजुरीची नेमकी व्याख्या आणि घरातल्या कामामागचं वास्तव समजून घेऊया!

शेतात काम करणाऱ्या मुलांवरही बालमजुरीचे कायदे लागू होतात का? वाचा पूर्ण माहिती!
child labourImage Credit source: Tv9 Gujarati
| Edited By: | Updated on: Jun 16, 2025 | 5:17 PM
Share

“बालमजुरी हा गुन्हा आहे,” हे आपण नेहमीच ऐकतो. पण नक्की कोणतं काम बालमजुरीच्या कक्षेत येतं, याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो. विशेषतः भारतासारख्या ग्रामीण भागात, जिथे अनेक कुटुंब शेतीवर किंवा घरगुती कामांवर अवलंबून आहेत, तिथे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. गावाकडे अनेक मुलं शाळेतून आल्यावर आई-वडिलांना मदत करतात. मग हे सगळं बालमजुरीच म्हणायचं का?

‘बालमजुरी’ची व्याख्या काय?

सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या व्याख्येनुसार, साधारणपणे जर मुलाचं वय १४ वर्षांपेक्षा कमी असेल आणि ते मूल असं कोणतंही काम करत असेल, ज्यामुळे त्याच्या शिक्षणावर, मानसिक आणि शारीरिक विकासावर किंवा आरोग्यावर वाईट परिणाम होत असेल, तर ते ‘बालमजुरी’ मानलं जातं. भारताच्या बाल कामगार अधिनियम, १९८६ नुसार, १४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही धोकादायक किंवा व्यावसायिक कामात गुंतवणं हे कायद्याने गुन्हा आहे. अर्थात, काही विशिष्ट कौटुंबिक व्यवसायांमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर हलक्या कामांसाठी काही अपवाद आहेत, पण तेही मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर परिणाम करणारे नसावेत.

घरातील काम बालमजुरी कधी ठरते?

आता महत्त्वाचा मुद्दा, जर एखादं गावखेड्यातील मूल घरात काम करत असेल किंवा शेतात मदत करत असेल, तर ते बालमजुरी म्हणायचं का? याचं उत्तर परिस्थितीवर अवलंबून आहे. जर मूल शाळेत जात असेल, अभ्यास करत असेल आणि त्यानंतर स्वतःच्या इच्छेने, आपल्या कुटुंबाला घरातल्या किंवा शेतातल्या हलक्या-फुलक्या कामांमध्ये मदत करत असेल, तर त्याला सामान्यतः बालमजुरी मानलं जात नाही. उदाहरणार्थ, घरात स्वच्छता करणं, पाणी भरणं किंवा शेतात छोटी-मोठी मदत करणं. ही कामं त्याच्या शिक्षणात किंवा आरोग्यात अडथळा आणणारी नसावीत.

परंतु, जर मुलाला शाळेत न पाठवता पूर्णवेळ घरच्या कामाला किंवा शेतीच्या कामाला जुंपलं जात असेल, किंवा ते काम त्याच्या वयाच्या मानाने खूप कठीण, धोकादायक किंवा जास्त तासांचं असेल, आणि त्या कामामुळे त्याच्या शिक्षणावर, आरोग्यावर किंवा खेळण्या-बागडण्याच्या वयावर गंभीर परिणाम होत असेल, तर ते नक्कीच ‘बालमजुरी’च्या श्रेणीत येऊ शकतं. जरी ते काम आर्थिक गरजेपोटी केलं जात असलं, पण ते मुलाच्या मूलभूत हक्कांपासून त्याला वंचित ठेवत असेल, तर ते स्वीकारार्ह नाही.

Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.