AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Murder : दिल्लीत पाण्यावरुन झालेल्या भांडणातून महिलेची गळा चिरुन हत्या, पतीवरही वार

दलित एकता कँप झोपडपट्टीत श्याम कला या आपल्या कुटुंबासह राहतात. 26 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्याम कला घराबाहेर पाणी भरत होती. त्याचवेळी घरासमोर राहणाऱ्या अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये पाणी भरण्यावरून भांडण झाले. अर्जुनची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. भांडण सुरू असतानाच अर्जुनने चाकूने महिलेचा गळा चिरला.

Delhi Murder : दिल्लीत पाण्यावरुन झालेल्या भांडणातून महिलेची गळा चिरुन हत्या, पतीवरही वार
पुण्यात पुन्हा हुंडाबळीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 5:55 PM
Share

नवी दिल्ली : पाणी भरण्यावरून झालेल्या भांडणात एका महिलेचा गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील वसंतकुंज परिसरात घडली आहे. महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या पतीच्या हातावरही आरोपीने वार (Attack) केला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 6 पथके तयार केली आहेत. पोलिस आरोपीचा सर्वत्र शोध घेत आहेत. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दहशतीमुळे स्थानिक लोक कमालीचे घाबरले आहेत. वसंतकुंज येथील दलित एकता कँपमध्ये ही घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. (A woman was strangled to death in a quarrel over water in Delhi)

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

दलित एकता कँप झोपडपट्टीत श्याम कला या आपल्या कुटुंबासह राहतात. 26 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्याम कला घराबाहेर पाणी भरत होती. त्याचवेळी घरासमोर राहणाऱ्या अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये पाणी भरण्यावरून भांडण झाले. अर्जुनची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. भांडण सुरू असतानाच अर्जुनने चाकूने महिलेचा गळा चिरला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. महिलेचा पती बचावासाठी आला असता आरोपी अर्जुनने महिलेच्या पतीवरही चाकूने वार केले, त्यानंतर तोही गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी रस्त्यात चाकू फिरवून सर्वांना धमक्या देण्यास सुरुवात केली.

आरोपीची नागरिकांना धमकी

कुणीही पोलिसांना बोलावले किंवा त्याच्या भांडणात पडले तर त्यांना मारुन टाकण्याची धमकी अर्जुनने दिली होती. मयत महिलेच्या मुलाने आरोप केला आहे की, पाणी भरण्यातून झालेल्या भांडणातून अर्जुनने आपल्या आईची हत्या केली. तसेच वस्तीतील नागरिकांनीही अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दादागिरीबद्दल सांगितले. आरोपी अर्जुन हा चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वी कारागृहात जाऊन आला आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. एकूणच हे कुटुंबच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. (A woman was strangled to death in a quarrel over water in Delhi)

इतर बातम्या

Aurangabad | राज ठाकरेंच्या सभेविषयी दोन दिवसात निर्णय घेणार, औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांचं काय वक्तव्य?

Jaipur Murder : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर कारमध्ये अत्याचार, हत्या करुन मृतदेह विहिरीत फेकला

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.