AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला, प्रश्न विचारताच केले दुर्लक्ष

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला. ज्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचा आदेश दिला आहेत.

Viral Video: दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला, प्रश्न विचारताच केले दुर्लक्ष
Pahalgam AttackImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 24, 2025 | 1:31 PM
Share

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या दरम्यान दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगात कार्यरत एक कर्मचारी केक घेऊन आत जाताना दिसला. माध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने उत्तर देण्यास नकार दिला. हा केक नेमका कोणता आनंद साजरा करण्यासाठी घेऊन जात आहेत असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. मात्र, त्याने यावर मौन बाळगले.

पाकिस्तान दूतावासात केक नेण्याबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. असेही म्हटले जात आहे की पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान खूश आहे. सत्य काहीही असले तरी पाकिस्तानी कर्मचाऱ्याने उत्तर देण्याचे टाळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाकिस्तानी उच्चायोगाबाहेरील सुरक्षा हटवली

भारत-पाकिस्तान संबंधांचा परिणाम दिसू लागला आहे. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानी दूतावासाबाहेर शांतता पसरली आहे. कोणताही सुरक्षारक्षक दिसत नाही.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सायंकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) तातडीची बैठक बोलावण्यात आली, ज्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीत असं सांगण्यात आलं की या हल्ल्यामागे सीमेपलीकडील कट रचले गेले आहेत. हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा केंद्रशासित प्रदेशात यशस्वीपणे निवडणुका पार पडल्या होत्या आणि क्षेत्र आर्थिक विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन सीसीएसने अनेक कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला.

पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावं लागेल

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत (एसव्हीईएस) पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना यापूर्वी जारी केलेले कोणतेही एसव्हीईएस व्हिसा रद्द समजले जातील. एसव्हीईएस व्हिसाअंतर्गत भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडावा लागेल.

दरम्यान, नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगातील संरक्षण, नौदल आणि वायुसेना सल्लागारांना ‘अवांछित व्यक्ती’ घोषित करण्यात आलं आहे. त्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडावा लागेल. त्याचप्रमाणे भारतही इस्लामाबादमधील आपले लष्करी सल्लागार आणि पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांना परत बोलवेल. दोन्ही देशांच्या उच्चायोगातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 करण्यात येईल, जी 1 मे पर्यंत लागू होईल.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत