AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?

Agniveer : अग्निवीर जवानांसाठी आनंदाची बातमी आहे. या जवानांना प्रशासन पर्मनंट करणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?
| Updated on: Jul 06, 2026 | 9:52 AM
Share

अग्नीवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 हून अधिक अग्नीवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदलाने सर्वाधिक जवान कायम करण्याची मागणी केली आहे. तर लष्कर आणि हवाई दलाने 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यापर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही.

अग्निपथ योजनेत सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, 4 वर्षांच्या सेवेनंतर मेरीटच्या आधारावर काही जवानांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 25 टक्के अग्नीवीर जवान कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना अग्निपथ योजनेतून मुक्त केलं जाईल. त्यानंतर सशस्त्र दलात रुजू होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांनाच सामील केले जाते. ही निवड मेरीटच्या आधारावर केली जाते .

अग्नीवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव 

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ‘नौदलाने सर्वाधिक अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदसाने 25 टक्क्यांहून थेट 75 टक्के अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केलाय. तर लष्कर आणि हवाई दलाने 50 टक्क्यांपर्यंत अग्निवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यांच्या मागणीवर अद्याप कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांचा 25 टक्के वाढवला नाही, तरी काही विशिष्ट युनिट्समध्ये सैनिक समाविष्ट केले जाऊ शकतात. परंतु ही मर्यादा 25 टक्क्यांपर्यंत ठेवली जाईल. गेल्या वर्षी सुमारे 70000 अग्निवीर प्रशिक्षणासाठी सैन्यात दाखल झाले. पुढील वर्षी सैन्यातील अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी रिक्त जागा 90 हजारांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. सैन्यातील 1.8 लाख सैन्याची कमतरता दूर करण्यासाठी सैन्य तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

अग्निपथ योजना काय आहे?

2022 साली सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना अग्नीवीर म्हणून सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. या योजनेमुळे तरुणांना सशस्त्र दलांमध्ये काम करण्याची संधी मिळते. या योजनेअंतर्गत अग्निवीरांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. . त्यांच्यासाठी सशस्त्र दलात एक विशेष पद दिले जाते. ते इतर पदापेक्षा वेगळे असते.

Follow Us
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना