AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?

Agniveer : अग्निवीर जवानांसाठी आनंदाची बातमी आहे. या जवानांना प्रशासन पर्मनंट करणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय

अग्निवीरांसाठी गुड न्यूज; आता 25 टक्क्यांहून अधिक जवान होणार पर्मनंट, काय आहे नेमका प्लान?
| Updated on: Jul 06, 2026 | 9:52 AM
Share

अग्नीवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 हून अधिक अग्नीवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदलाने सर्वाधिक जवान कायम करण्याची मागणी केली आहे. तर लष्कर आणि हवाई दलाने 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यापर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे. परंतु या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही.

अग्निपथ योजनेत सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, 4 वर्षांच्या सेवेनंतर मेरीटच्या आधारावर काही जवानांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव होता. यासाठी 25 टक्के अग्नीवीर जवान कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना अग्निपथ योजनेतून मुक्त केलं जाईल. त्यानंतर सशस्त्र दलात रुजू होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांनाच सामील केले जाते. ही निवड मेरीटच्या आधारावर केली जाते .

अग्नीवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव 

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ‘नौदलाने सर्वाधिक अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नौदसाने 25 टक्क्यांहून थेट 75 टक्के अग्निवीरांना कायम करण्याचा प्रस्ताव सादर केलाय. तर लष्कर आणि हवाई दलाने 50 टक्क्यांपर्यंत अग्निवीरांना कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यांच्या मागणीवर अद्याप कोणताही प्रतिक्रिया मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरांचा 25 टक्के वाढवला नाही, तरी काही विशिष्ट युनिट्समध्ये सैनिक समाविष्ट केले जाऊ शकतात. परंतु ही मर्यादा 25 टक्क्यांपर्यंत ठेवली जाईल. गेल्या वर्षी सुमारे 70000 अग्निवीर प्रशिक्षणासाठी सैन्यात दाखल झाले. पुढील वर्षी सैन्यातील अग्निवीरांची संख्या वाढवण्यासाठी रिक्त जागा 90 हजारांपर्यंत वाढवल्या जाऊ शकतात. सैन्यातील 1.8 लाख सैन्याची कमतरता दूर करण्यासाठी सैन्य तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

अग्निपथ योजना काय आहे?

2022 साली सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना अग्नीवीर म्हणून सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. या योजनेमुळे तरुणांना सशस्त्र दलांमध्ये काम करण्याची संधी मिळते. या योजनेअंतर्गत अग्निवीरांची 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये भरती केले जाते. . त्यांच्यासाठी सशस्त्र दलात एक विशेष पद दिले जाते. ते इतर पदापेक्षा वेगळे असते.

Follow Us
प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर
प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर पंचवटी एक्सप्रेस... मोठी अपडेट समोर
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण