AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात ज्यामुळे झाला ते थ्रस्ट म्हणजे काय? थ्रस्टची भूमिका किती महत्त्वाची?

12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतरच कोसळले. थ्रस्ट फेल्युअरमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पायलटने एटीसीला आपत्कालीन संदेश पाठवला होता, परंतु विमानाला वर उचलण्याची शक्तीच नव्हती. या दुर्घटनेत 275 जणांचा मृत्यू झाला. थ्रस्ट अपयशाचे विविध कारणे, जसे की इंजिन बिघाड, इंधनातील समस्या आणि नियंत्रण प्रणालीचे अपयश, यांचा विचार केला जात आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात ज्यामुळे झाला ते थ्रस्ट म्हणजे काय? थ्रस्टची भूमिका किती महत्त्वाची?
अहमदाबाद विमान दुर्घटनाImage Credit source: social media
| Updated on: Jun 16, 2025 | 2:39 PM
Share

अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचं कारण समोर आलं आहे. थ्रस्टमुळे हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विमानात हवेत उडण्याची शक्तीच उरली नाही. त्यामुळे विमान थेट खाली कोसळलं आणि मोठी दुर्घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतलं आणि काही सेंकदात पायलट सुमित सभरवाल यांनी एटीला मेडेचा एमर्जन्सी मेसेज पाठवला होता. सभरवाल यांनी नियमानुसार 650 फूट उंचावरून मेडे मेडे मेडे असं तिनदा म्हटलं होतं. थ्रस्ट नसल्यामुळे विमान वर जाऊ शकत नसल्याचं त्यांना जाणवलं होतं. अहमदाबाद एटीसने परत सभरवाल यांना संपर्क केला होता. पण तेवढ्यात सर्व संपलं होतं. सभरवाल यांचा नंतर संपर्क झालाच नाही.

अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने विमानाने टेक ऑफ केलं आणि अवघ्या 40 सेकंदात विमान कोसळलं. विमान कोसळण्याच्या आधी पायलट सभरवाल यांनी ट्रॅफिक कंट्रोलला फोन केला होता आणि एअर ट्रॅफिक सोबत त्यांचा संपर्क झाला होता. हे सर्व फक्त 15 सेकंदात झालं. त्यानंतर सभरवाल यांच्याकडे परत उत्तर मिळवण्यासाठी वेळच नव्हती. त्यामुळेही विमान कोसळल्याचं सांगितलं जातं.

थ्रस्ट म्हणजे काय?

आता पायलट सभरवालच्या आपत्कालीन कॉलवरून असे दिसून येते की, विमानात थ्रस्ट नसल्यामुळे हा अपघात झाला. थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती. थ्रस्टमुळे विमानाला हवेत उडण्याची शक्ती मिळते. सोप्या शब्दात सांगायचे तर, गाडीमध्ये एक्सिलरेटर असतं त्याप्रमाणेच विमानात थ्रस्टचं काम असतं. म्हणजेच, थ्रस्ट (जोर) दिल्याशिवाय विमान उडू शकत नाही.

थ्रस्टमधील समस्येचं कारण काय ?

आता, थ्रस्टमधील समस्येचे कारण काय आहे ? हे समजून घेऊ. पहिले कारण इंजिनमधील बिघाड असू शकतो. जर टर्बाइन ब्लेड तुटले किंवा इंधन पुरवठ्यात व्यत्यय आला तर थ्रस्ट कमी होऊ शकतो. निकृष्ट दर्जाचे इंधन किंवा इंधन पुरवठ्याच्या पाईपमधील बिघाडामुळे अथवा इंधनाच्या समस्येमुळे थ्रस्ट प्रभावित होतो.

नियंत्रण प्रणालीचे अपयश हे आधुनिक विमानांच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींवर अवलंबून असते. थ्रस्ट नियंत्रण प्रणाली किंवा सेन्सर फेल झाल्यास, इंजिन थ्रस्ट देऊ शकत नाही. खराब हवामान, जसे की उच्च उंचीवरील कमी हवेचा दाब किंवा अत्यंत तापमान, देखील थ्रस्टवर परिणाम करू शकते.

लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...