AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना झटका, विनावेतन पाच वर्षांच्या सुट्टीवर पाठवण्याच्या तयारीत

एअर इंडियाने काही कर्मचाऱ्यांना सहा महिने ते पाच वर्षांसाठी विना वेतन सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे (Air India send employees on leave without pay).

एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना झटका, विनावेतन पाच वर्षांच्या सुट्टीवर पाठवण्याच्या तयारीत
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी टाटाने लावली बोली
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 16, 2020 | 12:04 AM
Share

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने काही कर्मचाऱ्यांना सहा महिने ते पाच वर्षांसाठी विनावेतन सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे (Air India send employees on leave without pay).

कर्मचाऱ्यांचे कौशल्य, कामाची गुणवत्ता आणि आरोग्याचा विचार करुन कोणत्या कर्मचाऱ्याला किती दिवसांच्या सुट्टीवर पाठवावं, हा निर्णय घेतला जाणार आहे. या योजनेला ‘लीव विथाउट पे’ असंदेखील म्हणतात (Air India send employees on leave without pay).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

एअर इंडियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या 102 व्या बैठकीत या योजनेला मंजूरी देण्यात आली. या योजनेसुसार कर्मचाऱ्यांची यादी मुख्यालयात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनदरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आले. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं.

देशात 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणांना परवानगी देण्यात आली. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत 6 मेपासून विदेशात अडकलेल्या भारतीयांना एअर इंडियाच्या विमानांनी भारतात परत आणलं जात आहे.

एअर इंडियाची 20 जुलै पासून सर्व कार्यालये सुरु होणार

एअर इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. एअर इंडियाची सर्व कार्यालये 20 जुलै पासून सुरु होणार आहेत. त्यामुळे जो कर्मचारी कार्यालयात हजर राहणार नाही, त्याची सुट्टी गृहित धरली जाईल, असं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.

हेही वाचा : शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचं गुऱ्हाळ सुरुच, सेना संपर्क प्रमुखांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदारही उपस्थित

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...