AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajmer 92 | ‘द केरळ स्टोरी’नंतर ‘अजमेर 92’ चित्रपटावरुन वाद, काय आहे कारण

The Kerala Story and Ajmer 92 : 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद आता कुठे नुकताच संपला आहे. आता 'अजमेर 92' या चित्रपटावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीय.

Ajmer 92 | 'द केरळ स्टोरी'नंतर 'अजमेर 92' चित्रपटावरुन वाद, काय आहे कारण
ajmer 92
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 08, 2023 | 9:25 AM
Share

नवी दिल्ली : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपटासंदर्भात वाद (controversy) चांगलाच रंगला होता. परंतु देशभरातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला. ‘काश्मीर फाईल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी‘नंतर आता ‘अजमेर 92’ चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवरून आहे. या चित्रपटात अजमेर बलात्कार घटनेचे सत्य दाखवल्याची चर्चा आहे. अजमेर बलात्कार प्रकरणात 100 हून अधिक मुली त्याचा बळी ठरल्या होत्या. 1992 मध्ये, अजमेर बलात्कार प्रकरणाचा खुलासा पत्रकार असणाऱ्या संतोष गुप्ता यांनी केला होता.

कधी चित्रपट होणार रिलिज

पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित हा चित्रपट १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचे पोस्टर IMBD वर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये 250 मुलींना ब्लॅकमेल केल्याच्या बातम्यांचे कटिंग दिसत आहे. या प्रकरणातील बहुतांश आरोपी मुस्लिम होते तर पीडित मुली हिंदू आहेत. जमियत उलेमा-ए-हिंदने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटामुळे समाजात तेढ निर्माण होईल, असे जमियतचे अध्यक्ष महदूद मदनी यांनी म्हटले आहे.

कशी झाली घटना उघड

अजमेर बलात्काराची घटना 1992 साली एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून समोर आली होती. त्यावेळी राजस्थानमध्ये भैरोसिंह शेखावत यांचे सरकार होते. यामधील मुख्य दोन आरोपी युवक काँग्रेसचे होते. या दोघांच्या टोळीने प्रथम सोफिया स्कूल आणि सावित्री स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलींना आपल्या प्रभावाने अडकवले. आरोपी त्यांच्या साथीदारांसह पूर्वी मुलींवर लैंगिक अत्याचार करायचे. त्यानंतर त्यांची नग्न व आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना ब्लॅकमेल करायचे. पीडित मुलीवरही इतरांना आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. याशिवाय इतर प्रभावशाली लोकांकडेही मुली पाठवल्या जात होत्या. फोटो काढताना मुलींना निगेटिव्ह रील देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते कधीही दिले गेले नाही.

आरोपपत्र दाखल

सप्टेंबर 1992 मध्ये पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले. पहिल्या आरोपपत्रात 8 आरोपींची नावे होती. त्यानंतर आणखी 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सुरुवातीला 17 मुलींचे जबाब नोंदवले गेले. 1998 मध्ये अजमेर येथील न्यायालयाने आठ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, मात्र 2001 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने चौघांची निर्दोष मुक्तता केली होती. 2003 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित चौघांची शिक्षा जन्मठेपेवरून 10 वर्षांपर्यंत कमी केली.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय