AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर भाजपची लस, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? : अखिलेश यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर टीका करताना कोरोना लसीच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला.

ही तर भाजपची लस, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? : अखिलेश यादव
| Updated on: Jan 02, 2021 | 5:01 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर टीका करताना कोरोना लसीच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला. ही भाजपची लस आहे. तिच्यावर मी विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी केला. तसेच आम्ही भाजपची कोरोना लस घेऊ शकणार नाही. लवकरच आमचं सरकार येईल आणि तेव्हा आम्ही सर्वांना मोफत लस देऊ, असं आश्वासनही यावेळी अखिलेश यांनी दिलं (Akhilesh Yadav criticize BJP over Corona Vaccine raise question).

अखिलेश यादव म्हणाले, “मी सध्या तरी कोरोना लस घेणार नाहीये. भाजपच्या कोरोना लसीवर मी विश्वास कसा ठेवावा? आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांसाठी मोफत कोरोना लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही.”

यावेळी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. समाजवादी पक्षाचं सरकार आल्यानंतर अयोध्येतील नगर पालिका कर रद्द केला जाईल, असं आश्वासनही दिलं. त्यांनी शनिवारी (2 जानेवारी) अयोध्यात जाऊन सर्व धर्मगुरुंची भेट घेत आशिर्वादही घेतले आहेत.

‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचं बलिदान’

अखिलेश यादव यांनी शेतकरी आंदोलनावरुनही मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आंदोलनात गाझीपूर सीमेवर एका शेतकऱ्याच्या बलिदानाची बातमी सुन्न करणारी आहे. कडकडीत थंडीत शेतकरी आपल्या जीवाचं बलिदान करत आहेत. मात्र, सत्ताधारी निर्दयी होऊन बसले आहेत. भाजपसारखा सत्तेचा अहंकार आणि निर्दयीपणा आतापर्यंत कोणतही पाहिला नाही.”

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि केशव मौर्या यांच्याकडून पलटवार

अखिलेश यादव यांच्या कोरोनावरील वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी जीव वाचला तर सर्व काही करता येईल असं म्हटलंय. कोरोना लसीसाठी जगभरातील संशोधकांनी रात्रंदिवस एक करुन काम केलंय. अखिलेश यादव आपल्या राजकारणाचं बुडतं जहाज वाचवण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत.”

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले, “अखिलेश यादव यांना कोरोना लसीवर विश्वास नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला अखिलेश यादव यांच्यावर विश्वास नाही. लसीवर प्रश्न उपस्थित करणे हा त्या संशोधकांचा अपमान आहे. यासाठी त्यांनी माफी मागायला हवी.”

हेही वाचा :

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव

सपासोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही : मायावती

BSPचे 7 बंडखोर आमदार निलंबित, सपाला हरवण्यासाठी भाजपलाही मतदान करणार – मायावती

Akhilesh Yadav criticize BJP over Corona Vaccine raise question

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.