AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम लॉ बोर्डाचा पुन्हा फतवा, मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये !

शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याऐवजी सरकारने देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, देशाच्या सीमेचे रक्षण याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने केले आहे.

मुस्लीम लॉ बोर्डाचा पुन्हा फतवा, मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये !
Yoga
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 1:46 PM
Share

नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये 1 ते 7 जानेवारी दरम्यान सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने विरोध केला आहे. शाळांमध्ये असे कार्यक्रम घेऊ नयेत, अशी मागणीही बोर्डाच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नेमके प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात.

सरकारचा आदेश काय?

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. 30 राज्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 1 जानेवारी 2022 ते 7 जानेवारी 2022 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना आहेत. तर 26 जानेवारी रोजी सूर्यनमस्कारावर आधारित संगीत कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात 30 हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आंध्र प्रदेशच्या सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात तसे आदेश येऊन धडकले आहेत, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या पत्रात म्हटले आहे.

आक्षेप कशासाठी?

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी या निर्णयावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहु-सांस्कृतिक देश आहे. यावर आधारितच आपली राज्यघटना लिहिण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी शिक्षण संस्थेमध्ये धर्माबाबत शिक्षण द्यायला किंवा कोणत्या एका विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करायला, आपली राज्यघटना परवानगी देत नाही. सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे दुर्दैवी घटना असून, सध्याचे सरकार राज्यघटनेच्या मूळ उद्देशापासून भटक आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवाय मुस्लीम मुला-मुलींनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

बेरोजगारी, महागाईकडे लक्ष द्या

हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी पुढे म्हटले आहे की, सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे हे घटनाविरोधी कृत्य आहे. देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार आहे. मुस्लीम किंवा इतर अल्पसंख्याक ना सूर्याला देव मानतात ना त्याची उपासना, पूजा करतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेत धर्मनिरपेक्षता मूल्याचा सन्मान करावा, असे आवाहन केले आहे. शिवाय देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन केले आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, देशाच्या सीमेचे रक्षण याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 अर्ज; कशी रंगलीय निवडणूक?

Nashik| नाशिकमध्ये घरपट्टी माफ होणे तूर्तास अशक्य, घोडे कुठे आडले?

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...