AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया गेटवरच्या ‘अमर जवान ज्योती’चे आज होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण

1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 'अमर जवान ज्योती'ची स्थापना करण्यात आली होती. या युद्धात भारत विजयी झाला होता तर बांग्लादेशाची निर्मिती झाली होती.

इंडिया गेटवरच्या 'अमर जवान ज्योती'चे आज होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण
Amar jawan Jyoti
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 21, 2022 | 10:49 AM
Share

दिल्लीः भारताच्या राजधानीतील इंडिया गेटवर (India Gate) गेल्या 50 वर्षापासून तेवत असणाऱ्या ‘अमर जवान ज्योती’चे (Amar Jawan Jyoti) आज ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’मध्ये (National War Memorial) विलिनीकरण होणार आहे. ‘अमर जवान ज्योती’ची स्थापना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. या युद्धात भारत विजयी झाला होता तर बांग्लादेशाची निर्मिती झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जानेवारी 1972 मध्ये याचे उद्घघाटन केले होते. भारतीय सैन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की, ‘अमर जवान ज्योती’चे आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण केले जाईल. इंडिया गेटच्या दुसऱ्या बाजूला अगदा चारशे मीटरवरच हे ठिकाण आहे.

ब्रिटीश सरकारने 1914-1921 मध्ये ब्रिटीश भारतीय सेनेच्या सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची निर्मिती करण्यात आली होती. 1970 च्या दशकात पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारत विजयी झाल्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘अमर जवान ज्योती’ स्मारकाला मूर्त स्वरूप देण्यात आले होते. भारताविरोधात लढणाऱ्या देशातील 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. त्या घटनंतर दीर्घ कालखंडानंतर नरेंद्र मोदी सरकारतर्फे इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले होते. याचे उद्घघाटन 2019 मध्ये झाले होते. यावर 25 हजार 942 सैनिकांची नावे सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहेत. युद्ध स्मारकाच्या भवनमध्ये सैनिकांच्या औपचारिक कार्यक्रमांचे यामध्ये स्थलांतर केले होते.

प्रजासत्ताक दिन समारंभ 23 जानेवारीपासून

भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार असून 30 जानेवारी रोजी असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रमही याठिकाणी होणार आहे. 23 जानेवारी रोजी इंडिया गेटवर आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

प्रजासत्ताक दिनाच्या समारोप कार्यक्रमानिमित्त दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे का, 20 जानेवारीपासून देशाच्या राजधानीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, हवेत उडणाऱ्या वस्तू आणि काही हवाई उड्डाणांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश 20 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. राजधानातील महत्वाच्या संस्था आणि जनसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कडक नियम लावले असल्याचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.

राहुल गांधी यांचे ट्विवट

अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण होणार आहे. या निर्मिती बाबत आणि आजच्या होणाऱ्या उद्घघाटनसमारंभाबाबर कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी ट्विवट केले आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | Schools Reopen करण्याचा निर्णय चुकीचा, अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया

‘एफआरपी’ रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर

Video | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?