AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया गेटवरच्या ‘अमर जवान ज्योती’चे आज होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण

1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 'अमर जवान ज्योती'ची स्थापना करण्यात आली होती. या युद्धात भारत विजयी झाला होता तर बांग्लादेशाची निर्मिती झाली होती.

इंडिया गेटवरच्या 'अमर जवान ज्योती'चे आज होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण
Amar jawan Jyoti
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 10:49 AM
Share

दिल्लीः भारताच्या राजधानीतील इंडिया गेटवर (India Gate) गेल्या 50 वर्षापासून तेवत असणाऱ्या ‘अमर जवान ज्योती’चे (Amar Jawan Jyoti) आज ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’मध्ये (National War Memorial) विलिनीकरण होणार आहे. ‘अमर जवान ज्योती’ची स्थापना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. या युद्धात भारत विजयी झाला होता तर बांग्लादेशाची निर्मिती झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जानेवारी 1972 मध्ये याचे उद्घघाटन केले होते. भारतीय सैन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की, ‘अमर जवान ज्योती’चे आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण केले जाईल. इंडिया गेटच्या दुसऱ्या बाजूला अगदा चारशे मीटरवरच हे ठिकाण आहे.

ब्रिटीश सरकारने 1914-1921 मध्ये ब्रिटीश भारतीय सेनेच्या सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची निर्मिती करण्यात आली होती. 1970 च्या दशकात पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारत विजयी झाल्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘अमर जवान ज्योती’ स्मारकाला मूर्त स्वरूप देण्यात आले होते. भारताविरोधात लढणाऱ्या देशातील 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. त्या घटनंतर दीर्घ कालखंडानंतर नरेंद्र मोदी सरकारतर्फे इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले होते. याचे उद्घघाटन 2019 मध्ये झाले होते. यावर 25 हजार 942 सैनिकांची नावे सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहेत. युद्ध स्मारकाच्या भवनमध्ये सैनिकांच्या औपचारिक कार्यक्रमांचे यामध्ये स्थलांतर केले होते.

प्रजासत्ताक दिन समारंभ 23 जानेवारीपासून

भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार असून 30 जानेवारी रोजी असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रमही याठिकाणी होणार आहे. 23 जानेवारी रोजी इंडिया गेटवर आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

प्रजासत्ताक दिनाच्या समारोप कार्यक्रमानिमित्त दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे का, 20 जानेवारीपासून देशाच्या राजधानीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, हवेत उडणाऱ्या वस्तू आणि काही हवाई उड्डाणांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश 20 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. राजधानातील महत्वाच्या संस्था आणि जनसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कडक नियम लावले असल्याचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.

राहुल गांधी यांचे ट्विवट

अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण होणार आहे. या निर्मिती बाबत आणि आजच्या होणाऱ्या उद्घघाटनसमारंभाबाबर कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी ट्विवट केले आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | Schools Reopen करण्याचा निर्णय चुकीचा, अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया

‘एफआरपी’ रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर

Video | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.