AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया गेटवरच्या ‘अमर जवान ज्योती’चे आज होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण

1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 'अमर जवान ज्योती'ची स्थापना करण्यात आली होती. या युद्धात भारत विजयी झाला होता तर बांग्लादेशाची निर्मिती झाली होती.

इंडिया गेटवरच्या 'अमर जवान ज्योती'चे आज होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिनीकरण
Amar jawan Jyoti
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 10:49 AM
Share

दिल्लीः भारताच्या राजधानीतील इंडिया गेटवर (India Gate) गेल्या 50 वर्षापासून तेवत असणाऱ्या ‘अमर जवान ज्योती’चे (Amar Jawan Jyoti) आज ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’मध्ये (National War Memorial) विलिनीकरण होणार आहे. ‘अमर जवान ज्योती’ची स्थापना १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. या युद्धात भारत विजयी झाला होता तर बांग्लादेशाची निर्मिती झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जानेवारी 1972 मध्ये याचे उद्घघाटन केले होते. भारतीय सैन्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की, ‘अमर जवान ज्योती’चे आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण केले जाईल. इंडिया गेटच्या दुसऱ्या बाजूला अगदा चारशे मीटरवरच हे ठिकाण आहे.

ब्रिटीश सरकारने 1914-1921 मध्ये ब्रिटीश भारतीय सेनेच्या सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची निर्मिती करण्यात आली होती. 1970 च्या दशकात पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारत विजयी झाल्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘अमर जवान ज्योती’ स्मारकाला मूर्त स्वरूप देण्यात आले होते. भारताविरोधात लढणाऱ्या देशातील 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. त्या घटनंतर दीर्घ कालखंडानंतर नरेंद्र मोदी सरकारतर्फे इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले होते. याचे उद्घघाटन 2019 मध्ये झाले होते. यावर 25 हजार 942 सैनिकांची नावे सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहेत. युद्ध स्मारकाच्या भवनमध्ये सैनिकांच्या औपचारिक कार्यक्रमांचे यामध्ये स्थलांतर केले होते.

प्रजासत्ताक दिन समारंभ 23 जानेवारीपासून

भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीपासूनच सुरू होणार असून 30 जानेवारी रोजी असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला कार्यक्रमाची सांगता होणार आहे. 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रमही याठिकाणी होणार आहे. 23 जानेवारी रोजी इंडिया गेटवर आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

प्रजासत्ताक दिनाच्या समारोप कार्यक्रमानिमित्त दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे का, 20 जानेवारीपासून देशाच्या राजधानीत ड्रोन, पॅरा ग्लायडर, हवेत उडणाऱ्या वस्तू आणि काही हवाई उड्डाणांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश 20 जानेवारीपासून 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत. राजधानातील महत्वाच्या संस्था आणि जनसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कडक नियम लावले असल्याचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले.

राहुल गांधी यांचे ट्विवट

अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलिनीकरण होणार आहे. या निर्मिती बाबत आणि आजच्या होणाऱ्या उद्घघाटनसमारंभाबाबर कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनी ट्विवट केले आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | Schools Reopen करण्याचा निर्णय चुकीचा, अविनाश भोंडवे यांची प्रतिक्रिया

‘एफआरपी’ रकमेत अडकले 55 साखर कारखाने, कशामुळे होतेय वेगवेगळ्या रंगात कारखान्यांची यादी प्रसिध्द? वाचा सविस्तर

Video | लस न घेतलेल्यांना मुंबईत लोकलने प्रवास नाहीच, राज्य सरकारचा आदेश

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.