AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..

साखरेचा मुद्दा देशभरात गाजत आहे. साखरेच्या भावात मोठी वाढ होत आहे. त्यातच आता केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे साठेबाजांचे धाबे दणाणले आहेत. आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ साखरेची साठवणूक करता येणार नाही.

केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..
Sugar and pm modi
| Updated on: Aug 25, 2026 | 10:54 AM
Share

दिवाळीमध्ये साखरेचे भाव 100 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. खुल्या बाजारात साखरेचा दर 80 रुपयांवर पोहोचला आहे. सतत साखरेचे दर वाढत आहेत. लोक साखरेचा तुटवडा होऊ शकतो, म्हणून मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करत आहेत. यादरम्यान साठेबाजीविरोधात सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत. याबाबत केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. देशात वाढणाऱ्या साखरेच्या दरावर वचक ठेवणे हे मोठे आवाहन आज सरकारपुढे उभे आहे. केंद्रातील सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीबाबत नियमात सुधारणा केली आहे. शुद्ध केलेल्या साखरेवर दर दोन महिन्याने विकणे अनिवार्य केले. केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत.

सरकारच्या माहितीनुसार, आयातदारांना आता बिल ऑफ एंट्री दाखल केल्यापासून दोन महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती साखर म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत विकावी लागेल. हा एक अत्यंत मोठा निर्णय सरकारचा म्हणावा लागेल. दोन महिन्यातच साखर विकावी लागणार आहे. साखरेची होणारी साठेबाजी रोखण्यासाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला.

31 ऑक्टोबर 2026 ही निश्चित मुदत होती. टॅरिफ रेट कोटा अंतर्गत 10 लाख मेट्रिक टन (MT) कच्च्या साखरेच्या आयातीबाबतच्या नियमांमध्ये मोदी सरकारने सुधारणा केली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 20 जुलै रोजी साखरेचा भाव प्रति किलो 48.18 रुपये होता. 20 ऑगस्टपर्यंत त्याचा भाव वाढून प्रति किलो 55.70 रुपये झाला.

यावरून हे स्पष्ट होते की, एका महिन्यात साखरेच्या दरात प्रति किलो 7.52 रुपयांची साधारणपणे 15.6 टक्क्यांनी वाढला आहे. ही एक अत्यंत मोठी वाढ म्हणावी लागणार आहे. साखरेच्या वाढलेल्या दराबद्दल बोलताना केंद्रीय मंंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले की, त्पादनातील घटीबाबत सरकार चिंतेत आहे. इथेनॉलच्या मागणीमुळे साखरेचे उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सरकारकडून याबाबत मोठे पाऊले उचलली जात आहेत. साखर खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली. मोठ्या प्रमाणात साखर खरेदी केली जातंय.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला