AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी अग्निवीर परीक्षा समजू शकलेच नाही…, अमित शाह यांचा मोठा खुलासा

"या लोकांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे. पुन्हा पुन्हा खोटे बोलतात. मतमोजणी होईपर्यंत बोलणार आणि मग रजेवर जाणार. तिथून परत आल्यावर नवीन खोटे बोलणार", अशी टीका अमित शाह यांनी केली.

राहुल गांधी अग्निवीर परीक्षा समजू शकलेच नाही..., अमित शाह यांचा मोठा खुलासा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 28, 2024 | 11:23 PM
Share

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून अग्निवीर योजनेवरुन वारंवार भाजप सरकारवर निशाणा साधला जातो. त्यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “अग्निवीरमध्ये 100 सैनिकांपैकी 25 सैनिक कायम होतील, अशी व्यवस्था आहे. उर्वरितांना सरकार, पोलीस दल इत्यादींकडून सूट आणि इतर फायदे दिले जातील. कामावरून परतल्यावर एकही अग्निवीर निष्क्रिय बसणार नाही. त्यांच्यासाठी निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांमध्ये नोकऱ्या असतील”, असं अमित शाह म्हणाले.

“या लोकांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे. पुन्हा पुन्हा खोटे बोलतात. मतमोजणी होईपर्यंत बोलणार आणि मग रजेवर जाणार. तिथून परत आल्यावर नवीन खोटे बोलणार. राहुल गांधी यांनी हिमाचलमधील महिलांना वचन दिले होते. त्या महिला अजूनही वाट पाहत आहे. नोकरीचे आश्वासनही दिले होते. सर्व आश्वासने व्यर्थच राहिली. इंदिराजींनी गरिबी हटवण्याचे वचन दिले होते. पण मोदीजींनी गरिबांना त्यांचा हक्क दिला”, असं अमित शाह म्हणाले.

‘मी देशातील जनतेला वचन देतो की…’

“2014 मध्ये देशातील जनतेने नरेंद्र मोदींना ही सत्ता दिली होती. ते संविधानाच्या नावावर आरक्षणाबाबत बोलत आहेत, तर ते स्वत: हे काम करत आहेत. बंगाल आणि कर्नाटकातही त्यांनी असेच केले. मी देशातील जनतेला वचन देतो की, असे कधीही होऊ दिले जाणार नाही. देशात धर्माच्या आधारावर आरक्षणाची व्यवस्था नाही”, असं अमित शाह म्हणाले.

“आम्ही लहान असताना इंदिरा गांधींना घाबरत नव्हतो. मी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली”, असंदेखील अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी पंजाबच्या भगवंत मान सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आल्यानंतर भ्रष्टाचार अनेक पटींनी वाढला. दिल्लीचे मुख्यमंत्री जेव्हा कुठे जातात तेव्हा ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत जातात, अशी टीका अमित शाह यांनी केली.

Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...