AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ

अमेरिका आणि इराणकडून दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर पहिल्यांदाच भारतासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. यामुळे भारतावरील मोठं संकट दूर होणार आहे.

युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ
lpgImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 10:14 PM
Share

अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान सध्या पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेत वाटाघाटी सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेसमोर एक अट ठेवली होती ती म्हणजे आखाती देशांमध्ये असलेली इराणची जी संपत्ती अमेरिकेनं जप्त केली आहे, ती मुक्त करावी आणि लेबनॉनवर सुरू असलेले हल्ले थांबावेत, मात्र अमेरिकेनं इराणची संपत्ती सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची चर्चा पुढे जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा करतानाच अमेरिकेकडून इराणसमोर एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली होती, ती म्हणजे तातडीने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी सुरू करावा.

मात्र युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंदच ठेवला आहे.दिवसभरात या मार्गाने फक्त 15 जहाजं जातील असं इराणच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे अजूनही जगावरचं इंधन संकट कायम आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामावर वाटाघाटी सुरू असतानाच आता भारतासाठी एक गूड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे भारताच्या आणखी एका जहाजानं स्ट्रीट ऑफ होर्मूज पार केलं आहे. भारताच्या जग विक्रम नावाच्या जहाजनं होर्मूजची सामुद्रधुनी पार केली आहे.

हे जाहाज एलपीजी गॅस घेऊन भारताच्या दिशेनं निघालं आहे. युद्धविरामानंतर स्ट्रीट ऑफ होर्मूज पार करणारं हे पहिलं भारतीय जहाज आहे. या जहाजानं शुक्रवारी मध्यरात्री होर्मूजची सामुद्रधुनी पार केली आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यानंतर स्ट्रीट ऑफ होर्मूजमधून बाहेर पडणारं हे भारताचं 9 वं जहाज आहे. मात्र अजूनही 15 जहाजं याच मार्गावर अडकून पडले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हे जहाज तब्बल वीस हजार टन एलपीजी घेऊन भारताच्या दिशेनं येत आहे. या जहाजाची एलपीजी वहन करण्याची एकूण क्षमता 26000 टन एवढी आहे. यामुळे आता भारताला काही प्रमाणात का होत नाही दिलासा मिळणार आहे.

Follow Us
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.