AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव; सगळीकडे भीतीचे वातावरण

Northeast India Earthquake : आसामधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री सुमारे 9:10 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवली गेली.

मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव; सगळीकडे भीतीचे वातावरण
assam earthquake 4 2 magnitudeImage Credit source: Google
| Updated on: Jun 11, 2026 | 10:32 PM
Share

पूर्वोत्तर भारतातून मोठी बातमी समोर आली आहे. आसामधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री सुमारे 9:10 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवली गेली. अनेक भागांत सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपामुळे सगळीकडे भीतीचे वापावरण पसरले आहे. सुदैवाने, अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही.

आसाममध्ये पुन्हा भूकंप

समोर आलेल्या माहितीनुसार, याआधी रविवारी उशिरा रात्रीही राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी आसाम, मेघालय आणि ईशान्य भारतातील इतर भागांतही तीव्र कंपने जाणवली होती. भूतानजवळ रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचे केंद्र असमच्या काही भागांपासून सुमारे 252 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे ईशान्य भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा 4 दिवसांनी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

ईशान्य भारतात वारंवार भूकंप का होतात?

ईशान्य भारतात वेळोवेळी लहान-मोठे भूकंप होत असतात. यामागे या प्रदेशाची भौगोलिक आणि भूगर्भीय रचना कारणीभूत आहे. वैज्ञानिकांच्या मते, ईशान्य भारत पृथ्वीवरील अत्यंत सक्रिय टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमाजवळ स्थित आहे, जिथे सतत भूगर्भीय हालचाली होत असतात. याचा परिणाम पृष्ठभागावर जाणवतो, त्यामुळे भूकंप होतो.

भारतीय प्लेटची यूरेशियन प्लेटशी टक्कर

भारतीय टेक्टॉनिक प्लेट उत्तर दिशेकडे सरकत असून ती यूरेशियन प्लेटला धडकत आहे. कोट्यवधी वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झाली. ही प्रक्रिया आजही सुरू आहे. या दोन प्लेट्समधील ताणतणाव वेळोवेळी कमी जास्त होतो आणि त्यामुळे भूकंप होतात.

आसामखाली अनेक सक्रिय फॉल्ट लाईन्स

आसाम हे राज्य भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. या राज्याच्या खाली आणि आसपास अनेक सक्रिय फॉल्ट लाईन्स (भूगर्भीय तडे) आहेत. या भागांमध्ये खडकांचे थर एकमेकांच्या तुलनेत सरकत असतात. जेव्हा या ठिकाणी दबाव वाढतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि त्यामुळे पृथ्वी हादरते. अशीच परिस्थिती ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही आढळते. त्यामुळे या भागांमध्ये भूकंपाचा धोका कायम असतो.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर