AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हा भारतीय होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्यावेळी त्याच्याकडे इतकी संपत्ती होती की आजही लोक त्याचा अंदाज लावू शकत नाहीत. टाईम मासिकानेही त्यांना पहिल्या पानावर स्थान दिले होते.

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हा भारतीय होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 20, 2024 | 8:52 PM
Share

भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी परिस्थिती बिकट होती. लोकांना दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी ही खूप कष्ट करावे लागत होते. कारण इंग्रजांनी भारताला लुटून नेले होते. पण असं असताना देखील जगातील सर्वात श्रीमंत माणूस हा एक भारतीय होता हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हैद्राबादचा निजाम मीर उस्मान अली खान हा त्या काळी भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. निजामाकडे इतकी संपत्ती होती की त्याचा हिशेबच नव्हता. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती सुमारे 17.5 लाख कोटी रुपये होती असं एका पुस्तकात लिहिले आहे.

इतिहासकार डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम ॲड मिडनाईट’ या पुस्तकात सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हैदराबादच्या निजामाकडे 2 दशलक्ष पौंडपेक्षा जास्त रोकड होती, निजामाच्या राजवाड्यात नोटांचे बंड होते. त्याच्याकडे सोने, हिरे, चांदी यांचे भांडार असायचे.

जगातील सर्वात लोकप्रिय मासिक, टाईमने फेब्रुवारी 1937 च्या अंकात निजाम मीर उस्मान अली खान यांना पहिल्या पानावर स्थान दिले होते. कारण निजाम हा जगातील तेव्हा सर्वात श्रीमंत माणूस होता. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत ते सर्वात श्रीमंत होते. कॉलिन्स आणि लॅपिएरे यांनी त्यांच्या पुस्तकात असेही लिहिले आहे की, प्रसिद्ध ‘जेकब’ हिरा निजामाच्या राजवाड्यातील त्यांच्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आला होता. हैदराबादचा मीर उस्मान अली जितका श्रीमंत होता तितकाच तो कंजूषपणासाठीही कुप्रसिद्ध होता, असेही म्हटले जाते.

स्वातंत्र्याच्या वेळी, ब्रिटीश सरकारने त्यांना सन्माननीय पदवी बहाल केली होती. कारण ते भारतातील एकमेव शासक होते. ही पदवी त्यांना तशीच मिळाली नाही. पहिल्या महायुद्धादरम्यान निजामाने ब्रिटिश युद्ध निधीला 25 दशलक्ष पौंडांची मोठी देणगी दिली होती. ब्रिटीश सरकारप्रती त्यांच्या औदार्य आणि निष्ठेमुळे त्यांना ही पदवी देण्यात आली. मीर उस्मान अली खान हे त्यावेळी ब्रिटीश सरकारचे सर्वात विश्वासू मित्र मानले जात होते. मात्र यावर त्यांना अनेक टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.

हैदराबादचा निजाम, मीर उस्मान अली खान, अफाट संपत्ती असूनही, त्याच्या कंजूषपणासाठी ओळखला जात असे. त्यांच्या कंजूषपणाच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की जो कोणी त्याला भेटायला यायचा आणि ॲशट्रेमध्ये विझलेली सिगारेट सोडायचा निजाम नंतर ती पेटवून प्यायचा. मोठमोठे श्रीमंत लोक, सरदार आणि जमीनदार आपल्या राजाला एका अशरफीची नजराणा द्यायचे. नंतर राजा त्या अशरफीला हात लावून परत द्यायचा पण निजाम तो काढून घेत असे.

निजामाकडे सोन्याचा आणि हिऱ्यांचा मोठा साठा होता, ज्यात “जेकब स्टार” नावाचा प्रसिद्ध हिरा होता. निजामाकडे हैदराबाद राज्यात अफाट जमीन होती, जी अंदाजे लाखो एकर आहे. निजामाकडे अनेक कंपन्या होत्या, ज्यात रेल्वे, बँका आणि खाण कंपन्यांचा समावेश होता. निजामाकडे अनेक राजवाडे, रत्ने आणि कलाकृती होत्या.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा