AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हा भारतीय होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्यावेळी त्याच्याकडे इतकी संपत्ती होती की आजही लोक त्याचा अंदाज लावू शकत नाहीत. टाईम मासिकानेही त्यांना पहिल्या पानावर स्थान दिले होते.

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हा भारतीय होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
| Updated on: Jul 20, 2024 | 8:52 PM
Share

भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी परिस्थिती बिकट होती. लोकांना दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी ही खूप कष्ट करावे लागत होते. कारण इंग्रजांनी भारताला लुटून नेले होते. पण असं असताना देखील जगातील सर्वात श्रीमंत माणूस हा एक भारतीय होता हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हैद्राबादचा निजाम मीर उस्मान अली खान हा त्या काळी भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. निजामाकडे इतकी संपत्ती होती की त्याचा हिशेबच नव्हता. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती सुमारे 17.5 लाख कोटी रुपये होती असं एका पुस्तकात लिहिले आहे.

इतिहासकार डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांच्या ‘फ्रीडम ॲड मिडनाईट’ या पुस्तकात सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी हैदराबादच्या निजामाकडे 2 दशलक्ष पौंडपेक्षा जास्त रोकड होती, निजामाच्या राजवाड्यात नोटांचे बंड होते. त्याच्याकडे सोने, हिरे, चांदी यांचे भांडार असायचे.

जगातील सर्वात लोकप्रिय मासिक, टाईमने फेब्रुवारी 1937 च्या अंकात निजाम मीर उस्मान अली खान यांना पहिल्या पानावर स्थान दिले होते. कारण निजाम हा जगातील तेव्हा सर्वात श्रीमंत माणूस होता. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत ते सर्वात श्रीमंत होते. कॉलिन्स आणि लॅपिएरे यांनी त्यांच्या पुस्तकात असेही लिहिले आहे की, प्रसिद्ध ‘जेकब’ हिरा निजामाच्या राजवाड्यातील त्यांच्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आला होता. हैदराबादचा मीर उस्मान अली जितका श्रीमंत होता तितकाच तो कंजूषपणासाठीही कुप्रसिद्ध होता, असेही म्हटले जाते.

स्वातंत्र्याच्या वेळी, ब्रिटीश सरकारने त्यांना सन्माननीय पदवी बहाल केली होती. कारण ते भारतातील एकमेव शासक होते. ही पदवी त्यांना तशीच मिळाली नाही. पहिल्या महायुद्धादरम्यान निजामाने ब्रिटिश युद्ध निधीला 25 दशलक्ष पौंडांची मोठी देणगी दिली होती. ब्रिटीश सरकारप्रती त्यांच्या औदार्य आणि निष्ठेमुळे त्यांना ही पदवी देण्यात आली. मीर उस्मान अली खान हे त्यावेळी ब्रिटीश सरकारचे सर्वात विश्वासू मित्र मानले जात होते. मात्र यावर त्यांना अनेक टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.

हैदराबादचा निजाम, मीर उस्मान अली खान, अफाट संपत्ती असूनही, त्याच्या कंजूषपणासाठी ओळखला जात असे. त्यांच्या कंजूषपणाच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात की जो कोणी त्याला भेटायला यायचा आणि ॲशट्रेमध्ये विझलेली सिगारेट सोडायचा निजाम नंतर ती पेटवून प्यायचा. मोठमोठे श्रीमंत लोक, सरदार आणि जमीनदार आपल्या राजाला एका अशरफीची नजराणा द्यायचे. नंतर राजा त्या अशरफीला हात लावून परत द्यायचा पण निजाम तो काढून घेत असे.

निजामाकडे सोन्याचा आणि हिऱ्यांचा मोठा साठा होता, ज्यात “जेकब स्टार” नावाचा प्रसिद्ध हिरा होता. निजामाकडे हैदराबाद राज्यात अफाट जमीन होती, जी अंदाजे लाखो एकर आहे. निजामाकडे अनेक कंपन्या होत्या, ज्यात रेल्वे, बँका आणि खाण कंपन्यांचा समावेश होता. निजामाकडे अनेक राजवाडे, रत्ने आणि कलाकृती होत्या.

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....