AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात 2 दिवसात भरभरुन दान, इतक्या कोटींची देणगी जमा

Ram mandir : 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता राम मंदिर हे सर्वांसाठी खुले झाले आहे. दररोज येथे रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. पहिल्याच दिवशी जवळपास ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले. इतकंच नाही तर भक्तांनी राम मंदिरात भरभरुन दान दिले आहे.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात 2 दिवसात भरभरुन दान, इतक्या कोटींची देणगी जमा
| Updated on: Jan 25, 2024 | 7:40 PM
Share

Ram Mandir Donation : राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आता लाखोंच्या संख्येने लोकं अयोध्येला जात आहेत. पहिल्याच दिवशी 5 लाख लोकांनी राम मंदिरात दर्शन घेतले. राम मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत लाखो रुपयांचे दान जमा झाले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, 22 जानेवारी रोजी काउंटरवर सुमारे 6 लाख रुपयांची रोकड देणगी म्हणून देण्यात आली. ड्राफ्ट आणि चेकद्वारे एकूण 3 कोटी रुपयांचे दान मिळाले. 23 जानेवारी रोजी राम मंदिर ट्रस्टकडे 27 लाख रुपये रोख आले, तर 24 जानेवारी रोजी कॅश काउंटरवर 16 लाख रुपये दान म्हणून प्राप्त झाले.

देणग्या स्टेट बँकेकडे जमा होतात

राम मंदिरात दिलेल्या देणग्या काउंटरवर जमा केल्या जातात आणि त्याच्या पावत्या ही लगेच दिल्या जातात. दानपेटीशिवाय एक पैसाही घेतला जात नाही किंवा कोणाला दान करण्यास सांगितले जात नाही. अशी माहिती प्रकाश गुप्ता यांनी दिली. दान केलेले पैसे स्टेट बँकेच्या ताब्यात दिले जातात. बँकेचेच लोकं दानपेटी घेऊन जातात. त्यांची मोजणी अत्यंत सुरक्षित ठिकाणी केली जाते.  केवळ स्टेट बँकेचे कर्मचारीच हे पैसे काढतात.  स्टेट बँकेचे कर्मचारी आणि संस्थेचे लोकं येथे मॉनिटरिंग करतात.

राम मंदिर ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी यांनी सांगितले की प्रत्येक पैशाचा हिशेब आहे. जुन्या मंदिरातील दानपेटीतील पैशांबाबत ते म्हणाले की, पैसे काढून ठेवले आहेत. त्याची मोजणी झालेली नाही. मध्यंतरी सुट्ट्या असल्याने बँक कर्मचाऱ्यांना काम करता आले नाही.

भंडाऱ्यासाठीही भरभरुन दान

राम मंदिरात मोठ्या प्रमाणात धान्य पोहोचल्याचेही बोलले जात आहे. याबाबत ते म्हणाले की, येथे भंडारा सुरू आहे. भंडारे ट्रस्ट जो चालवत आहे तो यापुढेही चालवणार आहे. ते म्हणाले की, तांदूळ छत्तीसगडमधून आला आहे, तसा चहाची पाने आसाममधून आली. लोक इतकं देत आहेत की आम्हाला आमचा भंडारा चालवताना कोणतीही अडचण येत नाही. तसेच बाहेरून काहीही खरेदी करण्याची गरज नाही.

Follow Us
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.