AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी

Ayushman Bharat : आयुष्मान भारत या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे.

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी
ayushman bharat cover
| Updated on: Nov 23, 2025 | 7:30 PM
Share

भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयुष्मान भारत म्हणजे काय?

आयुष्मान भारत ही मोदी सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला आरोपग्यविमा दिला जातो. यामुळे गंभीर आजारावरील उपचार मोफत किंवा कमी पैशांमध्ये केले जातात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांचे कॅशलेस कव्हर मिळते. देशातील हजारो रुग्णालयांमध्ये याच्या माध्यमातून उपचार घेता येतात. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे.

कोणत्या सदस्यांना कव्हर मिळते?

या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी, मुले (नवजात बालके), पालक, आजी-आजोबा, भावंडे, सासू-सासरे आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या इतर सदस्यांच्या उपचारासाठी 5 लाखांचे कव्हर मिळते. सरकारने या योजनेत एक बदल केला आहे. आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. जर एखादे कुटुंबाने या योजनेसाठी आधीच नोंदणी केली असेल आणि त्या घरात एखाद्या सदस्याचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांना अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. अशाप्रकारे या कुटुंबाला 10 लाखांचे कव्हर मिळेल.

10 लाखांचे कव्हर कसे मिळवायचे ?

10 लाखांचे कव्हर मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. संबंधित वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करावे लागेल. यासाठी पात्र व्यक्तींना आधार ईकेवायसी पुन्हा करावी लागेल. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी कमाल वयाची कोणतीही अट नाही. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या देखील पूर्ण फायदे मिळतात. मोठी शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण अशा उपचारासाठीही हे कव्हर मिळते.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.