AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी

Ayushman Bharat : आयुष्मान भारत या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे.

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, या आहेत अटी
ayushman bharat cover
| Updated on: Nov 23, 2025 | 7:30 PM
Share

भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयुष्मान भारत म्हणजे काय?

आयुष्मान भारत ही मोदी सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला आरोपग्यविमा दिला जातो. यामुळे गंभीर आजारावरील उपचार मोफत किंवा कमी पैशांमध्ये केले जातात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांचे कॅशलेस कव्हर मिळते. देशातील हजारो रुग्णालयांमध्ये याच्या माध्यमातून उपचार घेता येतात. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे.

कोणत्या सदस्यांना कव्हर मिळते?

या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी, मुले (नवजात बालके), पालक, आजी-आजोबा, भावंडे, सासू-सासरे आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या इतर सदस्यांच्या उपचारासाठी 5 लाखांचे कव्हर मिळते. सरकारने या योजनेत एक बदल केला आहे. आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. जर एखादे कुटुंबाने या योजनेसाठी आधीच नोंदणी केली असेल आणि त्या घरात एखाद्या सदस्याचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांना अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. अशाप्रकारे या कुटुंबाला 10 लाखांचे कव्हर मिळेल.

10 लाखांचे कव्हर कसे मिळवायचे ?

10 लाखांचे कव्हर मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. संबंधित वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करावे लागेल. यासाठी पात्र व्यक्तींना आधार ईकेवायसी पुन्हा करावी लागेल. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी कमाल वयाची कोणतीही अट नाही. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या देखील पूर्ण फायदे मिळतात. मोठी शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण अशा उपचारासाठीही हे कव्हर मिळते.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.