AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहुबलीच्या मुलीचं लग्न; 50 क्विंटल नॉनवेज, 100 हून अधिक पक्वान्न, 3 लाख रसगुल्ल्यांनी करणार तोंड गोड

पटनामध्य हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सुरभी आणि राजहंसच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पटनामध्ये धूमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला बिहारच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

बाहुबलीच्या मुलीचं लग्न; 50 क्विंटल नॉनवेज, 100 हून अधिक पक्वान्न, 3 लाख रसगुल्ल्यांनी करणार तोंड गोड
बाहुबलीच्या मुलीचं लग्न; 50 क्विंटल नॉनवेज, 100 हून अधिक पक्वान्नImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 15, 2023 | 3:39 PM
Share

पटना: बिहारचे माजी खासदार आणि बाहुबली नेता आनंद मोहन यांची मुलगी सुरभी आनंद आज (बुधवार) लग्नबंधनात अडकणार आहे. सुरभीची हळद आणि संगीताचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. सुरभीचं लग्न मुंगेरमधल्या राजहंस सिंहशी होणार आहे. पटनामध्य हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सुरभी आणि राजहंसच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पटनामध्ये धूमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला बिहारच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

आनंद मोहन यांच्या मुलीच्या लग्नासाठी 100 हून अधिक पक्वान्नांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 50 क्विंटल मांसाहाराचीही व्यवस्था केली आहे. लग्नात चिकन, मटण आणि माशांचेही विविध पदार्थ असतील. त्याचसोबत शाकाहारी पाहुण्यांसाठीही विविध पक्वान्नांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुलाब जामून, रसमलाई, रसगुल्ला यांसारख्या मिठाईंचाही लग्नाच्या मेन्यूमध्ये समावेश असेल. या लग्नसोहळ्यासाठी जवळपास तीन लाख रसगुल्ले बनवले जाणार आहेत.

आनंद मोहन यांच्या मुलीच्या लग्नासाठी 15 हजारहून अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पटनाच्या बैरिया परिसरातील एका फार्ममध्ये याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या फार्ममध्ये कृत्रिम तलावसुद्धा बनवण्यात आले आहेत. या फार्मची क्षमता जवळपास 20 हजार लोकांची आहे.

कोण आहेत आनंद मोहन?

आनंद मोहन हे बिहारच्या राजकारणातील मोठं नाव आहे. 1994 मध्ये मुजफ्फरपूरमध्ये गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी कृष्णैय्या यांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आधी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर ती शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. आनंद मोहन सिंह हे मूळचे बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील पचगछिया गावातील आहेत. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी होते.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले.
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा.