AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाबरी शहीद केली अन् आता आणखी 3000..’; मौलाना तौकिर रजा काय म्हणाले? कोण आहेत ते?

त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय. त्यांनी देशभरातील मुस्लिमांना शुक्रवारपासून जेलभरो आंदोलन सुरु करण्याच अपील केलय. त्यांनी बाबरी मशिद, ज्ञानवापी मुद्यांवर मत मांडली. सीएए लागू होणार आहे, हा मुस्लिमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं ते म्हणाले.

'बाबरी शहीद केली अन् आता आणखी 3000..'; मौलाना तौकिर रजा काय म्हणाले? कोण आहेत ते?
maulana tauqeer raza
| Updated on: Feb 05, 2024 | 12:02 PM
Share

नवी दिल्ली : इत्तेहाद मिल्लत काउंसिलचे (आईएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रजा खान यांनी देशात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मुद्यांवर आपल मत मांडलय. त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाबरी मशिदीला शहीद केलं. आता आणखी 3000 हजार मशिदींची यादी बनवलीय” असं तौकीर रजा म्हणाले. ASI, कोर्ट आणि सरकारवर विश्वास उरला नसल्याच तौकीर रजा म्हणाले.

तौकीर रजा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जेल भरो आंदोलन सुरु करण्यास सांगितलं. त्यांनी देशभरातील मुस्लिमांना साथ देण्याच अपील केलय. शुक्रवारी जेल भरो आंदोलन होईल. मौलान तौकीर रजा म्हणाले की, “देशातील मशिदींवर रोज बुलडोझर चालवला जातोय. ज्ञानवापीची परिस्थिती तुमच्या सगळ्यांसमोर आहे. पण अशा अनेक मशिदी तोडण्यात आल्या आहेत. म्हणून सगळ्या जगात देशातील कायदा बदनाम होत आहे”

3000 मशिदींची यादी तयार

“बाबरी मशिदीला शहीद केलं. पण ज्ञानवापीला शहीद होऊ देणार नाही. बाबरी मशिदीच्या बाबतीत बेईमानी केली. तेच आता ज्ञानवापीच्या बाबतीत होतय” असं तौकीर रजा म्हणाले. या दरम्यान मौलानाने मथुराच्या शाही ईदगाहच सुद्धा उल्लेख केला. त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलं की, “हा सर्व 80/20 चा खेळ चाललाय. बाबरी आणि ज्ञानवापी शिवाय देशभरातील 3000 मशिदींची यादी बनवल्याच ते म्हणाले”

मानवतेच्या मारेकऱ्याला भारतरत्न

लालकृष्ण आडवाणींना भारत रत्न पुरस्कार देण्यावरही त्यांनी टीका केली. मानवतेच्या मारेकऱ्याला भारत रत्न पुरस्कार दिला असं ते म्हणाले. सीएए कायद्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. सीएए लागू होणार आहे, हा मुस्लिमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं ते म्हणाले. सरकारी तंत्रावर विश्वास ठेवण हे स्वत:ला फसवण्यासारख आहे, असं ते म्हणाले. कुठल्याही चौकशी समितीवर विश्वास ठेऊ नका असं ते म्हणाले.

शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....