AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भैय्यू महाराजांची आत्महत्या?

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच महाराजांची मुलगी आणि पत्नी एकत्र आल्या आहेत. संशयित सेवक आणि इतरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. डीआयजींकडे करण्यात आलेल्या या मागणीनंतर संशयितांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कलम 164 अंतर्गत चालकाचा जबाब नोंदवून घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. काय आहे माय-लेकींची […]

तरुणीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भैय्यू महाराजांची आत्महत्या?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM
Share

इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पहिल्यांदाच महाराजांची मुलगी आणि पत्नी एकत्र आल्या आहेत. संशयित सेवक आणि इतरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. डीआयजींकडे करण्यात आलेल्या या मागणीनंतर संशयितांना पकडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कलम 164 अंतर्गत चालकाचा जबाब नोंदवून घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

काय आहे माय-लेकींची मागणी?

भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःच्या बंदुकीतून गोळी घालून आत्महत्या केली होती. भय्यू महाराजांची मुलगी आणि दुसरी पत्नी डॉ. आयुषी यांचं पटत नव्हतं. पण दोघी पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. महाराजांनी घरगुती कारणांमुळे आत्महत्या केली नाही. त्यांना घर, गाडी, बंगला आणि कोट्यवधी रुपयांच्या मागणीसाठी ब्लॅकमेल केलं जात होतं, याची चौकशी व्हायला हवी. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला चालक कैलास पाटील याच्याकडे सगळी माहिती आहे. सेवक विनायक, शरद देशमुख आणि तरुणीकडून रचण्यात आलेल्या कटाची सर्व माहिती त्याच्याकडे आहे, असं या मायलेकींनी म्हटलं आहे.

कलम 164 काय आहे?

कोर्टात जबाब हा कलम 164 अंतर्गतच नोंदवावा अशी स्पष्ट विनंती महाराजांची पत्नी आणि मुलीने केली आहे. कारण, पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानंतर साक्षीदार आपलं म्हणणं नंतर बदलतात. पण 164 अंतर्गत जबाब नोंदवल्यानंतर जबाब बदलला जाऊ शकत नाही. जबाब बदलल्यास शिक्षेचीही तरतूद आहे.

‘दैनिक जागरण’च्या वृत्तानुसार, भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर सेवक आणि निकटवर्तीयांनी एक कट रचून आत्महत्येमागचं नेमकं कारण समोर येऊ दिलं नाही. पत्नी आणि मुलगी यांच्यातील कलहाला कंटाळून महाराजांनी आत्महत्या केल्याचं वृत्त पसरवण्यात आलं होतं. पण आता पहिल्यांदाच मुलगी आणि पत्नी एकत्र आल्या आहेत.

पैशांसाठी ब्लॅकमेलिंग

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैलास पाटीलच्या माहितीनुसार, भय्यू महाराजांची आत्महत्या एक असामान्य घटना होती. त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं. महाराजांची देखभाल करणाऱ्या एका तरुणीचा यामध्ये हात आहे. तिने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक अश्लील व्हिडीओ बनवला होता. डॉ. आयुषी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर या तरुणीचं येणंजाणं बंद झालं. हा व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देत तिने दर महिन्याला दीड लाख रुपये उकळणं सुरु केलं. ब्लॅकमेलिंगमध्ये जवळचे सेवकही सहभागी होते, असंही कैलास पाटीलचं म्हणणं आहे. पोलीस आता या सेवकांचा शोध घेत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.