AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचाऱ्यांकडून 90 तास कामाची अपेक्षा ठेवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का, व्यवस्थापनाचं टाळकं ठिकणावर आणणारा रिपोर्ट समोर

एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी कामांच्या तासांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, यातच आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

कर्मचाऱ्यांकडून 90 तास कामाची अपेक्षा ठेवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का, व्यवस्थापनाचं टाळकं ठिकणावर आणणारा रिपोर्ट समोर
| Updated on: Jan 28, 2025 | 8:55 PM
Share

एल अँण्ड टीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यम यांनी कामांच्या तासांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, यातच आता एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यानंतर नुकताच कर्मचाऱ्यांचा एक सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे म्हणजे ज्या कंपन्यांना असं वाटतं की आपल्या कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावं त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी केवळ आपली इच्छाच व्यक्त केली नाही तर आपला फैसला देखील सुनावला आहे. हा सर्व्हे म्हणजे अशा सर्व कंपन्यांसाठी एक मोठी चपराक आहे.

जागतिक स्थरावर नोकऱ्यांबाबत माहिती देणाऱ्या एका वेबसाईटनं या संदर्भात कर्मचाऱ्यांचा एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे या सर्व्हेमध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यातील 78 टक्के लोकांनी नोकरी आणि कुटुंब यामध्ये कुटुंबाला प्राथमिकता दिली आहे. यामध्ये सहभागी झालेल्या 78 टक्के लोकांनी असं म्हटलं आहे की आम्हाला नोकरीमध्ये मिळणाऱ्या प्रमोशनपेक्षा पत्नी, मुलंबाळ आणि आई-वडील यांचा आनंद अधिक महत्त्वाचा वाटतो. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या आरोग्यकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही अशा नोकरीच्या शोधात आहोत, जिथे आम्हाला चांगला पगारही मिळेल आणि आम्ही आयुष्याचा आनंद देखील घेऊ शकतो.

काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन साधण्याची इच्छा

या सर्व्हेमधून अशी देखील एक गोष्ट समोर आली आहे, की कर्मचाऱ्यांना आपलं काम आणि कुटुंब यांच्यामध्ये योग्य ते संतुलनं साधलं गेलं पाहिजे अशी इच्छा आहे. या सर्व्हेमधील तब्बल 90 टक्के लोकांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राथमिकता दिली आहे. तसेच काही जणांनी म्हटलं आहे की नोकरीतून मिळणारं उत्पन्न चांगलं असावं, त्यातून आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता यायला हव्यात. सोबतच कुटुंबाला देखील वेळ देता यावा. विशेष म्हणजे या सर्व्हेतील एकाही व्यक्तीनं 90 तास कामाचं समर्थन केलं नाही.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?