AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती पुढे, एका कुटुंबातील 4 व्यक्ती, 65 टक्के जळालेल्या…

झारखंडहून दिल्लीला निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. प्राथमिक तपास सुरू असून खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे कळतंय. यादरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे.

दिल्ली विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती पुढे, एका कुटुंबातील 4 व्यक्ती, 65 टक्के जळालेल्या...
Delhi plane crash
| Updated on: Feb 24, 2026 | 9:29 AM
Share

झारखंडच्या रांची येथील विमानतळावरून उड्डाण केलेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही. विमानाचा संपर्क तुटताच तपास यंत्रणा विमानाचा शोध घेत होत्या. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या भागात हे विमान कोसळले, त्याठिकाणी वातावरण अचानक बदलले आणि हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमानाने सायंकाळी 7 .11 दरम्यान उड्डाण भरली. मात्र, विमानाची काही वेळातच संपर्क तुटला. रांचीहून दिल्लीकडे हे विमान निघाले होते. विमानातील 7 ही जणांचा या अपघाता मृत्यू झाला. विमानाचा शेवटचा संपर्क 7 वाजून 34 मिनिटाला झाला, त्यानंतर विमानासोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. वाराणसी हवाई हद्दीत विमान काही वेळ होते पण त्याचा संपर्क होऊ शकला नाही. झारखंडमधील चतरा आणि सिमरियाच्या सीमावर्ती भागात विमान कोसळल्याचे आढळून आले.

या विमान अपघाताबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. ज्या विमानाचा अपघात झाला ते एक खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होते. या विमानात एकाच कुटुंबातील चार व्यक्ती होते. रांची येथून ते उपचारासाठी दिल्ली येथे जात होते. मिळालेली अधिकची माहिती अशी की, कॅप्टन विवेक भगत, कॅप्टन सवराजदीप सिंह यांच्यासोबत रूग्ण संजय कुमार, यांच्यासोबत धुरू कुमार आणि अर्चना देवी होते.

यासोबतच डॉक्टर सचिन मिश्रा आणि विकास गुप्ता विमानात होते. याबाबत माहिती देताना देवकमल रूग्णालयाचे डॉक्टर सिन्हा यांनी म्हटले की, रूग्ण संजय कुमार यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना दिल्ली येथे घेऊन गेले जात होते. संजय कुमार खूप जास्त जळाले होते. 65 टक्के ते जळाले असल्याने मागील 7 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते मुळ बिहार येथे रहिवासी होते.

दिल्लीला त्यांना घेऊ जाण्याकरिता खासगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होती. 16 जानेवारी 2026 रोजी एका आगीच्या घटनेत ते जळाले होते. त्यांच्यावर आमच्याकडे उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात उपचारासाठी सल्ला दिला. आता एकाच कुटुंबातील 4 जण या विमान अपघातात गेल्याची माहिती आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?