AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीला निघालेल्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती, 7 जणांचा मृत्यू, ज्याठिकाणी अपघात झाला तिथे…

दिल्लीला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला असून या अपघाताबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. घटनास्थळी अधिकारी पोहोचले. पण विमानाची सर्वांचा मृत्यू झाला.

दिल्लीला निघालेल्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती, 7 जणांचा मृत्यू, ज्याठिकाणी अपघात झाला तिथे...
Delhi plane crash
| Updated on: Feb 24, 2026 | 7:25 AM
Share

झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून निघालेल्या विमानाची भीषण अपघात झाला. हे विमान झारखंड येथून दिल्लीकडे निघाले होते. हे एक खाजगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला. विमानात एकून 7 जण प्रवास करत होते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला, हा अत्यंत भीषण अपघात होता, यापैकी एकही प्रवासी वाचू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. विमान अपघातानंतर काही वेळातच तपास ब्युरो (AAIB) ची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालक यांच्याकडून एक निवेदनीही जारी करण्यात आले. मात्र, या विमान अपघातामुळे मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या डीजीसीएच्या माहितीनुसार, विमानाने रांची विमानतळावरून सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटाला उड्डाण केले. कोलकता हवाई वाहतूक नियंत्रणाशी त्यांचा शेवटचा संपर्क 7 वाजून 34 मिनिटाला झाला. त्यानंतर विमान रडार आणि रेडिओच्या संपर्कातून बाहेर गेले. वाराणसीच्या आसपास हा संपर्क तुटला. या विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता.

वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोल नुसार, त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विमानाशी संपर्क झाला नाही. शेवटी विमानाची संपर्क होत नसल्याचे लक्षात येताच बचाव समन्वय केंद्र सक्रिय करण्यात आले आणि लगेचच शोध मोहिम सुरू करण्यात आली. झारखंडमधील चतरा आणि सिमरियाच्या सीमावर्ती भागात विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. ज्या भागात हे विमान कोसळले, त्या भागात अचानक वातावरण खराब आणि पाऊस झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची 7 ही जणांचा मृत्यू झाला. कॅप्टन विवेक विकास बिलगत, कॅप्टन सवरदीप सिंग, रुग्ण संजय कुमार, अर्चना देवी, धुरु कुमार हे होते तर यासोबच डॉ. विकास कुमार गुप्ता डॉक्टर, सचिन कुमार मिश्रा हे देखील विमानात होते. अपघात नेमका कसा झाला याचा शोध सध्या घेतला जात आहे. या विमान अपघाताचे प्राथमिक कारण तर खराब हवामान सांगितले जात आहे.

Follow Us
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत