AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल’, काँग्रेसचं थेट गृहमंत्र्यांना पत्र नेमकं प्रकरण काय?

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे.

'राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल', काँग्रेसचं थेट गृहमंत्र्यांना पत्र नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2025 | 8:22 PM
Share

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे. या प्रकरणात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाळ यांनी गृहमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

केरळच्या एका न्यूज चॅनलवर लडाखमध्ये उफाळलेल्या हिंसाचारावर चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात भाजपची बाजू मांडताना एबीव्हीपीचे माजी अध्यक्ष पिंटू महादेव यांनी म्हटलं की, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल. पिंटू महादेव हे अनेक चॅनलवर भाजपची बाजू मांडताना दिसतात.

काँग्रेसचं अमित शाह यांना पत्र

या प्रकरणाची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाळ यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. सुरुवातीला तुम्ही राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरून त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, आता तर तुम्ही त्यांना गोळी मारण्याची भाषा करत आहात, असं या पत्रात वेणुगोपाळ यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांच्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पत्रात पुढे असं देखील म्हटलं आहे की, राहुल गांधी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची आधीच हत्या झाली आहे. गांधी कुटुंबाने आपल्या घरातील दोन व्यक्तींना गमावलं आहे. हे पत्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं असून, ते अनेक नेत्यांना टॅग देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राहुल गांधी यांना मिळालेल्या धमकीवरून सुप्रिया श्रीनेत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. मला राहुल गांधी यांच्या सुरक्षेची चिंता होत आहे. मला वाटतं त्यांना धोका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.