AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाचा तो आजार समजला अन् नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; भर लग्नमंडपातच… समोर आलेलं गुपित काय?

Wedding Drama : लग्नाच्या विधीदरम्यान वर खुर्चीवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर नवरीने भर मंडपातच मोठा निर्णय घेतला आहे.

नवरदेवाचा तो आजार समजला अन् नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; भर लग्नमंडपातच... समोर आलेलं गुपित काय?
Wedding DramaImage Credit source: Google
| Updated on: May 11, 2026 | 6:41 PM
Share

संपूर्ण भारतात सध्या लगीनसराई सुरू आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज विवाहसोहळे पार पडत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. एटा जिल्ह्यात एका नवरीने भर मंडपात राडा घातला. नवरीचा आरोप होता की, वराच्या वैद्यकीय स्थितीबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी लपवली होती. त्यामुळे नवरीच्या कुटुंबाने लग्नाच्या पुढील विधींना नकार देत वराची हेल्थ रिपोर्ट दाखवण्याची मागणी केली. ही घटना साकीत परिसरात घडली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, नवरदेव हा काटोली गावचा रहिवासी असून रविवारी संध्याकाळी तो वऱ्हाडी मंडळींसह साकितमधील एका गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला होता. त्याचे लग्न नागला फुले गावातील विजय सिंह यांच्या मुलीसोबत होणार होता. लग्नाच्या विधाला सुरुवात झाली. मात्र लग्नाच्या विधीदरम्यान वर खुर्चीवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काहींनी त्याला पाणी पाजले, तर काहींनी डॉक्टरांकडे धाव घेतली. सुरुवातीला वराच्या कुटुंबीयांनी ही घटना घाबरल्यामुळे झाली असे सांगत दुर्लक्ष केले. मात्र नंतर नवरीच्या कुटुंबीयांनी वराच्या तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

मेडिकल रिपोर्ट दाखवा

नवरीच्या कुटुंबाने आरोप केला की, लग्न ठरवण्यापूर्वी वराच्या नातेवाईकांनी त्याच्या आजाराची माहिती त्यांच्यापासून लपवली होती. या घटनेनंतर हा वाद वाढला आणि शाब्दिक चकमकीत बदलला. स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि नातेवाईकांनी दोन्ही बाजूंना समजवण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू असताना नवरीने स्पष्ट सांगितले की, वराचe हेल्थ रिपोर्ट दाखवला तरच लग्न होईल.

पोलिसांची एन्ट्री

वादानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, वादादरम्यान दोन्ही कुटुंबांतील सदस्यांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर नवरीच्या बाजूच्या दोन जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. अनेक लोकांनी हे लग्न लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आणि तिचे कुटुंब लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. नवरीने भरमंडपात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे नवरदेवाला वधूशिवायच वरात परत न्यावी लागली.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!