AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाचा तो आजार समजला अन् नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; भर लग्नमंडपातच… समोर आलेलं गुपित काय?

Wedding Drama : लग्नाच्या विधीदरम्यान वर खुर्चीवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर नवरीने भर मंडपातच मोठा निर्णय घेतला आहे.

नवरदेवाचा तो आजार समजला अन् नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; भर लग्नमंडपातच... समोर आलेलं गुपित काय?
Wedding DramaImage Credit source: Google
| Updated on: May 11, 2026 | 6:41 PM
Share

संपूर्ण भारतात सध्या लगीनसराई सुरू आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज विवाहसोहळे पार पडत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. एटा जिल्ह्यात एका नवरीने भर मंडपात राडा घातला. नवरीचा आरोप होता की, वराच्या वैद्यकीय स्थितीबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी लपवली होती. त्यामुळे नवरीच्या कुटुंबाने लग्नाच्या पुढील विधींना नकार देत वराची हेल्थ रिपोर्ट दाखवण्याची मागणी केली. ही घटना साकीत परिसरात घडली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, नवरदेव हा काटोली गावचा रहिवासी असून रविवारी संध्याकाळी तो वऱ्हाडी मंडळींसह साकितमधील एका गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला होता. त्याचे लग्न नागला फुले गावातील विजय सिंह यांच्या मुलीसोबत होणार होता. लग्नाच्या विधाला सुरुवात झाली. मात्र लग्नाच्या विधीदरम्यान वर खुर्चीवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काहींनी त्याला पाणी पाजले, तर काहींनी डॉक्टरांकडे धाव घेतली. सुरुवातीला वराच्या कुटुंबीयांनी ही घटना घाबरल्यामुळे झाली असे सांगत दुर्लक्ष केले. मात्र नंतर नवरीच्या कुटुंबीयांनी वराच्या तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

मेडिकल रिपोर्ट दाखवा

नवरीच्या कुटुंबाने आरोप केला की, लग्न ठरवण्यापूर्वी वराच्या नातेवाईकांनी त्याच्या आजाराची माहिती त्यांच्यापासून लपवली होती. या घटनेनंतर हा वाद वाढला आणि शाब्दिक चकमकीत बदलला. स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि नातेवाईकांनी दोन्ही बाजूंना समजवण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू असताना नवरीने स्पष्ट सांगितले की, वराचe हेल्थ रिपोर्ट दाखवला तरच लग्न होईल.

पोलिसांची एन्ट्री

वादानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, वादादरम्यान दोन्ही कुटुंबांतील सदस्यांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर नवरीच्या बाजूच्या दोन जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. अनेक लोकांनी हे लग्न लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आणि तिचे कुटुंब लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. नवरीने भरमंडपात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे नवरदेवाला वधूशिवायच वरात परत न्यावी लागली.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....