AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Protest : 26 मार्च रोजी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, 19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिन

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

Farmer Protest : 26 मार्च रोजी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, 19 मार्चला 'मंडी बचाओ-खेची बचाओ' दिन
farmers-protest-photo
| Updated on: Mar 10, 2021 | 9:39 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकरी नेते बूटा सिंह बुर्जगिल यांनी सांगितलं की, 15 मार्चला शेतकरी आणि व्यापारी संघटना मिळून पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि रेल्वेच्या खासगीकरणा विरोधात आंदोलन करतील.(Call for Bharat Bandh on March 26 by farmers’ organizations)

आम्ही 26 मार्चला शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण होत असल्यामुळे देशभरात भारत बंद आंदोलन केलं जाईल. हा बंद अत्यंत शांततेत पार पडेल, असा दावा बूटा सिंह बुर्जगिल यांनी केला आहे.

19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिन

शेतकरी संघटना 19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिवस पाळतील असंही सांगण्यात आलं आहे. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनी शहीद दिवस साजरा करण्याचा निर्णयही शेतकरी संघटनांनी घेतला आहे. त्याचबरोबर 28 मार्चला असलेल्या होळीमध्ये नव्या शेतकरी कायद्यांच्या प्रति जाळण्यात येतील असंही शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलंय.

राकेश टिकैत 13 मार्च रोजी कोलकाता दौऱ्यावर

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत 13 मार्च रोजी कोलकाता दौऱ्यावर असणार आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर टिकैत यांच्या कोलकाता दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत पश्चिम बंगालमधील शेतकरी संघटनांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, टिकैत कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा दर्शवणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे.

देशातील शेतकरी भाजपच्या नितीमुळे त्रस्त आहेत, असा आरोप टिकैत यांनी केला आहे. 13 मार्च रोजी कोलकात्यातून निर्णायक लढाईचं बिगूल वाजवलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला ते भाजपचा पराभव करण्याचं आवाहन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Delhi Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलन चिघळलं, दिल्लीत काय काय बंद?

Farmers protest | शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार?, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा

Call for Bharat Bandh on March 26 by farmers’ organizations

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.