AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समता, सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा आरंभ, जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन!

केंद्र सरकारने नुकतेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

समता, सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा आरंभ, जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन!
dharmendra pradhan
| Updated on: Apr 30, 2025 | 7:14 PM
Share

Caste Census Decision : केंद्र सरकारने नुकतेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले असून सबका साथ सबका विकास यासोबतच सामाजिक न्यायच्या भूमिकेलाही या निर्णयामुळे सशक्ती मिळाली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाष्य केलंय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने जनगणनेत जातीनिहाय जनगणनेचा समावेश करण्याचं ठरवलं आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं मी स्वागत करतो. वंचित, मागास यांनी नीती ठरवताना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी, समाजातील सर्वच स्तरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी, सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक असमानतेला पारदर्शी तसेच प्रामाणिक पद्धतीने दूर करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. सर्वच वर्गातील अधिकार सुनिश्चित करण्यासाठीही हे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून…

तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून एक यशस्वी सरकार चालवत आहेत. मोदी संविधानाच्या मूळ भावनेला अनुसरून सर्वांची साथ-सर्वांचा विकास या संकल्पासोबत सरकार सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक सरकार चालवत आहेत,’ असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान यांची काँग्रेसवर टीका

त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना काँग्रेस तसेच विरोधकांवर टीकाही केली. ‘काँग्रेस तसेच विरोधी पक्षांनी जातीनिहाय जनगणनेच्या विषयावर लोकांची नेहमीच फसवणूक केलेली आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा या विषयाला फक्त कास्ट सर्वेपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले. जातिनिहाय जनगणनेला कधीही जनगणनेचा भाग करण्यात आले नाही,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच मात्र मोदी यांची नीती ही स्पष्ट आणि दूरदर्शी निर्णय घेणारी आहे. इतिहासात झालेल्या चुका सुधरणारा केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच हे शक्य झाले,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

Follow Us
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.