अखेर राज्यसभा निवडणुकीत तो घातपात झाला! काँग्रेसच्या सर्वात चर्चेतल्या उमेदवाराचा अर्ज बाद; ऐनवेळी मोठा गेम
मध्य प्रदेशात एकूण तीन जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार होता. त्यापैकी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने आता फक्त तीन उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. हे तिन्ही उमेदवारी भाजपाचेच आहेत.

Meenakshi Natarajan : महाराष्ट्रासह देशातही सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासू ते अर्जांच्या पडताळणीपर्यंत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काँग्रेसकडून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद होणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मीनाक्षी नटराजन यांनी काँग्रेस पक्षातर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी मध्य प्रदेशातून हा अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या अर्जावर भाजपाने आक्षेप घेतला होता. नटराजन यांनी आपल्या अर्जात त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या तक्रारींची माहिती आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही, असा आरोप भाजपाने केला होता. हाच आक्षेप ग्राह्य धरून नटराजन यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे झाला अर्ज बाद
हैदराबाद मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात नगरसेविका ए श्रीलता यांनी मीनाश्री नटराजन यांच्याविरोधात एक याचिका दाखल केलेली आहे. शिवकुमार रेड्डी नावाच्या व्यक्तीन माझी छेड काढली. त्या व्यक्तीला नटरजान यांनी संरक्षण दिले, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 ,61,45 तसेच इतर कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात खटला उभा करावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. याबाबबत मीनाक्षी नटराजन यांना नोटीसही पाठवण्यात आली होत. याच प्रकरणाची माहिती नटराजन यांनी आपल्या अर्जात दिली नव्हती. भाजपाने यावरच आक्षेप घेतला होता.
आता उरले भाजपाचे तीन उमेदवार
दरम्यान, मध्य प्रदेशात एकूण तीन जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. या तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार होता. त्यापैकी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने आता फक्त तीन उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. हे तिन्ही उमेदवारी भाजपाचेच आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
