AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या 20 नोव्हेंबर रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान
Kisan Vijay Diwas
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 6:35 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या 20 नोव्हेंबर रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात उद्या किसान विजय दिवस साजरा करतानाच संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्रं लिहिलं आहेत. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण देशात विजय दिवस साजरा करा. रॅली काढा. तसेच देशाच्या विविध भागात संध्याकाळी कँडल मार्च काढून या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करा, असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसची जोरदार तयारी

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात संघर्ष उभा केला. त्याला काँग्रेससह विरोधी पक्षाने बळ दिलं. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं असा काँग्रेसचा दावा आहे. पुढील वर्षी पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने उद्या देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा असेल कार्यक्रम

>> उद्या देशभरात किसान विजय दिवस साजरा होणार >> त्यानिमित्त उद्या देशभरात प्रत्येक जिल्ह्यात रॅलीचं आयोजन केलं जाणार >> प्रत्येक जिल्ह्यात विजयी सभांचं आयोजन केलं जाणार >> मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात संध्याकाळी कँडल मार्च काढला जाणार >> ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते घरी जाऊन भेट घेणार

प्रियंका गांधींची मागणी

दरम्यान, मोदींनी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटले. त्यांचं दु:ख मी समजू शकते. सरकार गंभीर आहे तर त्यांनी लखीमपूर खेरीबाबत योग्य कार्यवाही करावी. केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या देशात शेतकऱ्यांसोबत सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ते कर्जात बुडाले आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्या गोष्टी आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्यावी. ते प्रश्न सोडावावेत, अशी मागणीही प्रियंका गांधी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही आणि दहशतवादी कोण म्हणालं होतं? तुमचेच नेते हे बोलत होते ना? त्यावेळी तुम्ही काय करत होता. तेव्हा मोदी गप्प का होते? मोदींनीच शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं होतं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

संबंधित बातम्या:

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?