AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या 20 नोव्हेंबर रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kisan Andolan News: कृषी कायदे रद्द, काँग्रसेचा उद्या जल्लोष, देशभर रॅली, कँडलमार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फर्मान
Kisan Vijay Diwas
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 6:35 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने उद्या 20 नोव्हेंबर रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात उद्या किसान विजय दिवस साजरा करतानाच संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्रं लिहिलं आहेत. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण देशात विजय दिवस साजरा करा. रॅली काढा. तसेच देशाच्या विविध भागात संध्याकाळी कँडल मार्च काढून या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करा, असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसची जोरदार तयारी

शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात संघर्ष उभा केला. त्याला काँग्रेससह विरोधी पक्षाने बळ दिलं. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं असा काँग्रेसचा दावा आहे. पुढील वर्षी पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने उद्या देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा असेल कार्यक्रम

>> उद्या देशभरात किसान विजय दिवस साजरा होणार >> त्यानिमित्त उद्या देशभरात प्रत्येक जिल्ह्यात रॅलीचं आयोजन केलं जाणार >> प्रत्येक जिल्ह्यात विजयी सभांचं आयोजन केलं जाणार >> मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात संध्याकाळी कँडल मार्च काढला जाणार >> ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते घरी जाऊन भेट घेणार

प्रियंका गांधींची मागणी

दरम्यान, मोदींनी कायदे मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटले. त्यांचं दु:ख मी समजू शकते. सरकार गंभीर आहे तर त्यांनी लखीमपूर खेरीबाबत योग्य कार्यवाही करावी. केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या देशात शेतकऱ्यांसोबत सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ते कर्जात बुडाले आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्या गोष्टी आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्यावी. ते प्रश्न सोडावावेत, अशी मागणीही प्रियंका गांधी यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही आणि दहशतवादी कोण म्हणालं होतं? तुमचेच नेते हे बोलत होते ना? त्यावेळी तुम्ही काय करत होता. तेव्हा मोदी गप्प का होते? मोदींनीच शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं होतं, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

संबंधित बातम्या:

Follow Us
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात