AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले, केंद्राचे नवे नियम काय?

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलाय. दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले असल्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय. आता फक्त सोशल डिस्टंसिंग आणि मास्क गरजेचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आलंय.

दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले, केंद्राचे नवे नियम काय?
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलाय. दोन वर्षानंतर कोरोनाबाबतचे सगळे नियम हटवले (Unlock India) असल्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आलंय. आता फक्त सोशल डिस्टंसिंग आणि मास्क (Mask) गरजेचा आहे, असेही स्पष्ट करण्यात आलंय. केंद्र सरकारने निर्बंध संपूर्ण संपुष्टात आणण्याची घोषणा केली, असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मास्क लावण्याचा नियम मात्र कायम असणार आहे. येत्या 31 मार्चपासून देशातील कोरोना निर्बंध (Corona New Rules) संपणार, अशी माहिती देण्यात आलीय. केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्व हठवली जाणार, असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. मास्कमुक्तीबाबत सध्या निर्णय झालेला नाही. त्यामुळं जनतेला मास्क वापरावाचं लागणार आहे. आज ही नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय.

निर्बंध पूर्णपणे सैल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आता कोरोनाची साथ कमी झाल्याने, निर्बंध हटवल्यास आर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील नियंत्रणात आली आहे. आता आवळलेले निर्बंध संपुष्टात आले आहेत. केंद्र सरकारच्या वतीने कोरोना संदर्भात कोणतेही नवीन आदेश लागू करण्यात येणार नाहीत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच भविष्यात पुन्हा कोरोनाचे संकट डोके वर काढू नये यासाठी काय करावे हे सांगण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळेवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांकडून राज्यांना सल्ला दिला जाणार आहे.

तीन लाटांनी जगाला हैराण केले

गेल्या जवळपास अडीच वर्षापासून कोरोनाने जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे घरात बसून राहवं लागलं आहे. मात्र आता लसीकरणाचे अस्त्र आपल्याकडे असल्यामुळे दिवसेंदिवस दिलासा मिळत चालला आहे. भारतातील निर्बंध हटवले असले तरी काही देशात पुन्हा रुग्ण वाढत असल्यामुळे आपल्यालाही अलर्ट मोडवर राहवं लागणार आहे. काही देशांवर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. चीन आणि युरोपातील काही देशांचा धोका पुन्हा वाढला आहे.

दिल्ली विमानतळावरच लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, तातडीने AIIMSमध्ये दाखल; पाच डॉक्टरांचं पथक तैनात

महाराष्ट्रातील लोकं Petrol भरण्यासाठी थेट गुजरातमध्ये! दर 100च्या आत, पेट्रोलसाठी नंदुरबारमधील वाहनांच्या रांगा

tv9 Special: धूण्या भांड्याचं पाणी ‘रियूज’ करणार, मोदी सरकारकडून प्रोजेक्टचा शुभारंभ, तुमचं पाणी परत तुमच्याकडेच !

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.