AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात 3805 नवे कोरोनाबाधित रूग्ण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजारांहून अधिक

शुक्रवारी देशात कोरोनाचे 3,545 नवीन रुग्ण आढळले. तसेच 27 कोरोना बाधिक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 300 ने वाढ झाली आहे. परंतु गुरूवारच्या तुलनेत मृत्यू 5 ने कमी झाले आहेत.

Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात 3805 नवे कोरोनाबाधित रूग्ण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 हजारांहून अधिक
पुण्यात दोन दिवसात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढImage Credit source: tv9
| Updated on: May 07, 2022 | 3:25 PM
Share

नवी दिल्ली – भारतात कोरोना (Corona) विषाणू संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोविड-19 संसर्गाची 3,805 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासात 22 मृत्यू झाले आहेत. तसेच 3,168 कोरोना रूग्णांनी संसर्गावर मात केली आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या आता 20,303 च्या आसपास पोहोचली आहे. भारतातल्या (India) एकूण संसर्गाच्या 0.05 टक्के असं हे प्रमाण आहे.

दिल्ली हे देशाचे कोरोना हॉटस्पॉट राहिले आहे

शुक्रवारी देशात कोरोनाचे 3,545 नवीन रुग्ण आढळले. तसेच 27 कोरोना बाधिक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. 24 तासांत नवीन रुग्णांमध्ये सुमारे 300 ने वाढ झाली आहे. परंतु गुरूवारच्या तुलनेत मृत्यू 5 ने कमी झाले आहेत. राजधानी दिल्ली हे देशाचे कोरोना हॉटस्पॉट राहिले आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 1656 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र,चोवीस तासात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे दिल्लीत 24 तासांत 1306 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 6096 वर पोहोचली आहे. सध्याचा संसर्ग दर 5.39 टक्के झाला आहे.

कोरोना रूग्णांचा बरा होण्याचा दर 98.74 टक्के

भारतातील कोरोना रूग्णांचा बरा होण्याचा दर 98.74 टक्के आहे. तर दिवसाला रूग्ण बरे होण्याचा दर ०.७८% आहे. देशात आतापर्यंत 84.03 कोटी कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 4,87,544 नमुने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या आता 4,25,54,416 झाली आहे. त्याचबरोबर आज 7 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत भारतात 190 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. 12-14 वर्षे वयोगटातील 3.01 कोटी पेक्षा जास्त मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.