AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रभरात मृत्यूचे तांडव, थेट नदीवरील पुल कोसळला, ढिगाऱ्याखाली असंख्य लोक, तब्बल इतक्यांचा मृत्यू..

निसर्गाचे एक रौद्ररूप बघायला मिळत आहे. चक्रीवादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले. थेट 6 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळाने थैमान घातले. थेट नदीवरील पुल कोसळला आहे. अनेक लोक ढिसाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

रात्रभरात मृत्यूचे तांडव, थेट नदीवरील पुल कोसळला, ढिगाऱ्याखाली असंख्य लोक, तब्बल इतक्यांचा मृत्यू..
bridge collapsed due to the cyclone
| Updated on: May 29, 2026 | 9:44 AM
Share

वादळी वाऱ्याने मोठे थैमान घातले. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह मोठा पाऊस झाला. ज्यात 100 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. मोठे नुकसानही झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये निसर्गाने थैमान घातले. उत्तर प्रदेशच्या हमीरपुरमध्ये अचानक जोरदार वारे आणि पाऊस आला. त्याने भयंकर घटना घडली. अचानक हवामानात बदल झाला. बेतवा नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू होते. रात्री 3 वाजता अचानक जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला. सर्वत्र धुळ आणि जोरदार वाऱ्यामुळे काहीच दिसत नव्हते. काही क्षणात परिस्थिती बदलून गेली आणि सर्वकाही हालत होते. यादरम्यानच बेतवा नदीवर पुल बांधण्याचे काम सुरू असतानाच पुल पडला. काही लोक पिलरवर अडकली. 6 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला. अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य पोहोचवण्याच्या सूचनाही दिल्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, मोठे तूफान असल्याने मदतकार्य करण्यास उशीर झाला. मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याकरिता क्रेनची मदत घेतली जात आहे.

प्रशासनाकडून प्रयत्न केली जात आहेत की, जास्तीत जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढता येईल. हेच नाही तर उत्तर प्रदेशच्या अन्य काही भागातही या वादळीवाऱ्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. काैशांबीमध्ये वादळीवाऱ्यामुळे घर पडून 3 लोकांचा मृत्यू झाला. रायबरेलीमध्ये पुराच्या पाण्यात 1 महिला वाहून गेली.

योगी आदित्यनाथ यांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळ थैमान घालताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मोठ्या चक्रीवादळाने नुकसान झाले असतानाच रात्री 3 वाजता पुन्हा चक्रीवादळ धडकले. एक एक करून या प्रकरणातील माहिती पुढे येत आहे. प्रशासनाकडून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले, तिथे मदतकार्य पोहोचवले जात आहे.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा