AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेकांच्या मिठीत घेतला शेवटचा श्वास, दिल्लीच्या आगीत प्रेमाचा करुण अंत; सुन्न करणारी कहाणी

या आगीत एका कपलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेहाचे काही फोटो समोर आले असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. एकमेकांच्या गळ्यात पडून त्यांनी आयुष्याच्या शेवटच क्षण जगून घेतला आहे.

एकमेकांच्या मिठीत घेतला शेवटचा श्वास, दिल्लीच्या आगीत प्रेमाचा करुण अंत; सुन्न करणारी कहाणी
delhi hotel fire couple diedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2026 | 8:52 PM
Share

Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीतील फ्लॉरिश हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही लोकांनी आगाने होरपळल्यामुळे जीव गमावला तर काही लोकांच्या नाकातोंडात धूर गेल्याने गुदरमून त्यांचा अंत झाला. या घटनेच्या हादरवून टाकणाऱ्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. बचावकार्य करणाऱ्या लोकांनीदेखील या आगीच्या घटनेची भीषणता किती होती, याबाबत सांगितलं आहे. आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये जळालेले सामान, लोकांचा जळालेले मृतदेह पाहून मन सुन्न होत आहे. दरम्यान, या आगीत एका कपलचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेहाचे काही फोटो समोर आले असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांनी एकमेकांना साथ दिली आहे. त्या दोघांनीही साक्षात मृत्यू समोर उभा असताना एकमेकांना शेवटपर्यंत साथ दिली आहे.

महिलेचे डोके पुरुषाच्या खांद्यावर

फ्लॉरिश हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. परंतु तरीदेखील 21 जणांचा मृत्यू झाला. हेच बचावकार्य करणाऱ्या मनाला चटका लावणारे दृश्य सांगितले आहे. बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हॉटेलमधील बंद वॉशरुममध्ये एक कपल मृतावस्थेत आढळले. त्या बाथरुममध्ये महिला टॉयलेट सीटवर बसलेली होती. तर तिच्याजवळ एक माणूस खुर्चीवर बसलेला होता. महिलेने आपले डोके पुरुषाच्या खांद्यावर ठेवलेले होते. दोघांनाही एकमेकांना मिठीत घेतलेले होते. या दोघांचाही तशाच अवस्थेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कपलचा मृत्यू आगीने नव्हे तर धुराने

हे दृश्य पाहून बचावकार्य करणाऱ्या लोकांचेही मन हेलावून गेले आहे. आगीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी हे कपल बाथरुममध्ये गेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपला जीव वाचेल अशी दोघांनाही आशा होती. बचावकार्य करणाऱ्या एकाने सांगितल्यानुसार या कपलचा मृत्यू आगीने नव्हे तर धुराने झालेला आहे. आम्ही त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती बचावकार्य करणआऱ्या मोहम्मद शोएब यांनी दिली आहे.

दरम्यान, त्याच हॉटेलमध्ये आणखी एका खोलीत जळालेल्या अवस्थेत एक कपल आढळले. दोघांचाही मृतदेह पूर्णपणे जळाला होता. मृत्यूची ही कहाणी ऐकून देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ