AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, याआधी अनेक स्फोट, कधी हादरली दिल्ली ?

दिल्लीत काल संध्याकाळी कारमध्ये भीषण स्फोट झाला. त्यानंतर कारला भीषण आग लागली, आसपासच्या गाड्यांनीही पेट घेतला.यामध्ये आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक लोक जखमी आहेत. यापूर्वीही दिल्ली स्फोटांनी हादरली होती, कधी ते जाणून घेऊया.

Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, याआधी अनेक स्फोट, कधी हादरली दिल्ली ?
delhi blast
| Updated on: Nov 11, 2025 | 12:22 PM
Share

Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी 7च्या सुमारास भीषण स्फोट (Delhi Blast) झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर कारला आग लागली आणि जवळच उभ्या असलेल्या एक-दोन कारनाही आग लागली. त्याच 9 जणांनी जीव गमावला तर अनेक जण जखमी झालेत. या स्फोटनंतर अनेक अपडेट्स समोर येत असून कसून तपास करण्यात येत आहे. स्फोटापूर्वी ही कार 3 तास आधीच त्या जागी उभी होती अशी माहिती समोर येत आहे, तर कालचालकाचा एक संदिग्ध फोटोही समोर आला आहे. दरम्यान याधीही राजधानी दिल्लीत अनेकवेळा स्फोट झाले असून अनेक निरपराध लोकांना जीव गमवावा लागला आहे.

दिल्लीत कधी झाले होते स्फोट जाणून घेऊया.

25 मे 1996 : लाजपत नगर सेंट्रल मार्केट मध्ये स्फोट – 16 जणांचा मृत्यू

1 ऑक्टोबर 1997: सदर बाजारजवळ 2 स्फोट – 30 जखमी

10 ऑक्टोबर 1997: शांतिवन, कौड़िया पुल तसेच किंग्सवे कँप जवळ 3 स्फोट – 1 ठार , 16 जखमी

18 ऑक्टोबर 1997: रानी बाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट- 1 ठार 23 जखमी

26 ऑक्टोबर 1997: करोल बाग मार्केट मध्ये 2 स्फोट – 1 ठार, 34 जण जखमी

30 नोव्हेंबर 1997: लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट – ३ जण ठार, ७० जण जखमी.

30 डिसेंबर 1997: पंजाबी बागेजवळ बसमध्ये स्फोट – ४ जण ठार, ३० जण जखमी.

16 मार्च 2000: सदर बाजारात स्फोट – ७ जण जखमी.

27 फेब्रुवारी 2000- : पहाडगंजमध्ये स्फोट – ८ जण जखमी.

18 जून 2000 : लाल किल्ल्याजवळ दोन स्फोट – 2 जण ठार, 12 जण जखमी.

22 मे 2005 : लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहात दोन स्फोट – 1 जण ठार, 60 जण जखमी.

29 ऑक्टोबर 2005 : सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे दोन स्फोट – अंदाजे 59 ते 62 लोक ठार, 100 + जखमी

14 एप्रिल 2006 : जामा मशिदीत दोन स्फोट – 14 जण जखमी.

13 सप्टेंबर 2008 : करोल बाग (गफ्फार मार्केट), कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास-1 येथे पाच स्फोट – 20-30 जणांचा मृत्यू, 90+ जखमी.

27 सप्टेंबर 2008: मेहरौली फ्लॉवर मार्केट (सराई) येथे स्फोट – ३ जणांचा मृत्यू, २३ जण जखमी.

25 मे 2011: दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट – कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हे असे स्फोट आहेत ज्यांनी एकेकाळी राजधानी दिल्ली हादरवून टाकली होती. त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले. तर काल दिल्लीत पुन्हा स्फोटामुळे दिल्लीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा स्फोट लाल किल्ल्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर झाला, जो बहुतेकदा खूप वर्दळीचा असतो. तिथे सुरक्षाही असते. तरीही हा स्फोट झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.