AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : धर्मो रक्षति रक्षितः – ऑपरेशन सिंदूरनंतर हा श्लोक ट्रेंडमध्ये, याचा अर्थ काय ?

Operation Sindoor : भारताने काल मध्यरात्री हवाई हल्ला करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. भारतीयांना या कारवाईची माहिती मिळताच, "धर्मो रक्षति रक्षितः" हे सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. धर्मो रक्षती रक्षितःचा ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया..

Operation Sindoor : धर्मो रक्षति रक्षितः - ऑपरेशन सिंदूरनंतर हा श्लोक ट्रेंडमध्ये, याचा अर्थ काय  ?
ऑपरेशन सिंदूरImage Credit source: social media
| Updated on: May 07, 2025 | 2:28 PM
Share

7 मे, मंगळवारी मध्यरात्री 1:05 वाजता भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आणि सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. जेव्हा संपूर्ण देश झोपेत होता, तेव्हा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याची माहिती सकाळी भारतीयांना मिळताच, ‘धर्मो रक्षति रक्षितः’ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला, पण हा काही पूर्ण श्लोक नाही. धर्मो रक्षति रक्षिता हा एक लोकप्रिय संस्कृत श्लोक असून त्याचा उल्लेख महाभारत आणि मनुस्मृतीत आहे. याचा अर्थ असा की जर आपण धर्माचे रक्षण केले तर तो आपले रक्षण करतो. या श्लोकाचा ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया…

पूर्ण श्लोक काय?

हे संस्कृत वाक्यांश मनुस्मृतीतील एका संपूर्ण श्लोकाचा भाग आहे, तो असा आहे..

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः। तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्।

म्हणजेच, जेव्हा धर्म नष्ट होतो, तेव्हा तो त्याचा नाश करणाऱ्यांचा नाश करतो आणि संरक्षित धर्म रक्षकाचे रक्षण करतो. म्हणून, आपण कधीही धर्माचे उल्लंघन करू नये, जेणेकरून नष्ट झालेला धर्म आपल्याला कधीही नष्ट करू शकणार नाही.

हा श्लोक धर्माच्या शक्तीचे प्रतीक

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर ‘धर्मो रक्षाति रक्षितः’ हा श्लोक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला असून सर्वत्र भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जात आहेत. हा सामान्य श्लोक नाही. हे सनातन धर्माच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि असं दर्शवतं की हा धर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. जर कोणी या धर्माविरुद्ध कट रचला तर हा धर्म त्याचा नाश करतो. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ हा शब्द महाभारतात दोन ठिकाणी आढळतो, पण दोन्ही ठिकाणी शब्दांमध्ये थोडा फरक आहे.

वनपर्वात युधिष्ठिर यक्षाला सांगतो-

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ⁠। तस्माद् धर्मं न त्यजामि मा नो धर्मो हतोऽवधीत् ⁠॥

अर्थात – मृत धर्म मारणाऱ्याचा नाश करतो आणि संरक्षित धर्म तारणाऱ्याचे रक्षण करतो. म्हणूनच मी कधीही धर्म सोडू शकत नाही, नाहीतर तो नष्ट होईल आणि मला नष्ट करेल.

अनुशासन पर्वामध्ये हा श्लोक असा लिहिला आहे…

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः ⁠। तस्माद् धर्मो न हन्तव्यः पार्थिवेन विशेषतः ⁠॥

अर्थात – नष्ट झालेला धर्म मारणाऱ्याचा नाश करतो आणि संरक्षित धर्म नेहमीच तारणाऱ्याचे रक्षण करतो. म्हणून धर्माची हत्या करू नये, विशेषतः ऐहिक गोष्टींमुळे.

पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जण ठार झाले. त्याच भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही कडक कारवाई करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्यात माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले, म्हणून भारताच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तानमध्ये असलेल्या जैश, लष्कर, हिजबुल मुजाहिदीनच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आणि 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले. या कारवाईअंतर्गत, माता आणि बहिणींच्या सिंदूरचा बदला घेण्यात आला.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.